Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरड कोसळण्याच्या भीतीने गावकऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी घरे बांधलेली? नीलम गोऱ्हे यावर काय म्हणाल्या?

दरड कोसळण्याच्या भीतीने गावकऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी घरे बांधलेली? नीलम गोऱ्हे यावर काय म्हणाल्या?

| Updated on: Jul 22, 2023 | 1:01 PM

बुधवारी मध्यरात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेला राज्याचा वन व महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रायगड, 22 जुलै 2023 | बुधवारी मध्यरात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेला राज्याचा वन व महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. गावकऱ्यांनी डोंगर कोसळेल या भीतीने पायथ्याशी स्थलांतर केले होते. मात्र त्या झोपड्या वनविभागाने हटवल्या. त्यामुळे परत ही मंडळी आहे, त्याच घरात राहायला गेली. जर वनविभागाने त्यांच्या झोपड्या हटवल्या नसत्या तर या दुर्घटनेत बळी गेलेले शेकडो निष्पाप जीव वाचले असते, असं म्हटलं जात आहे. दरम्यान खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर नीलम गोऱ्हे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की…, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 22, 2023 01:01 PM