राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

| Updated on: Jun 29, 2024 | 2:39 PM

मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी, ठाणे, पालघर, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाचा यलो अलर्ट.

Follow us on

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.