Video : शिंदे गटाचे दोन उमेदवार बदलणार ? राजकारणात चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले असून त्यातील दोन जागांवरच स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हे दोन जागांचे उमेदवार बदलणार का ? याची चर्चा सुरु आहे.

Video : शिंदे गटाचे दोन उमेदवार बदलणार ? राजकारणात चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Apr 01, 2024 | 9:07 PM

शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. तर हातकणंगले येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाही विरोध होत आहे. धैर्यशील माने यांच्या विरोधात भाजपा पुरस्कृत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे हे उमेदवार बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हिंगोलीतील हेंमत पाटील यांना बदलण्याची मागणी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नांदेडच्या विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होणार आहे. हिंगोलीत शिंदे विरुद्ध ठाकरे सामना आहे. हिंगोलीत उमेदवार देण्याचा अधिकार शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. निवडून येईल असा उमेदवार सुचविण्याचे काम आपण करु शकतो. महायुतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचाच उमेदवार असेल. प्रत्येकाने युतीचा धर्म पाळावा असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. तेथे राजू शेट्टी यांना ठाकरे पाठींबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. ज्या ठिकाणी उमेदवार कमजोर असेल तेथे उमेदवार बदलला जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले असून त्यातील दोन जागांवरच विरोध होत आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.