छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही पाण्यावाचून तडफडून मेले

सुखना धरणातील पाणी सुखून गेल्याने मानवाला तर फटका बसलाच आहे, शिवाय पाण्यातील जलचर देखील मेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या जनावरांना चारा देखील उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही पाण्यावाचून तडफडून मेले
| Updated on: May 27, 2024 | 5:02 PM

छत्रपती संभाजी नगरातील सुखना धरण यंदाच्या तीव्र उन्हामुळे संपूर्णपणे सुखून गेले आहे. या धरणातील मृतपाणीसाठी तेवढा शिल्लक राहीला आहे. त्यातील मासे, आणि इतर जीव कसेबसे जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. या धरणातील जलसाठ्याचे तीव्र उन्हाच्या झळांमुळे बाष्पीभवन झाले असून पाणी आटून गेले आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा संपल्याने जमीनीला एक फूटाहून अधिक लांबीच्या भेगा पडल्या आहेत. तसचे शंख शिंपले हे पाण्याअभावी मृत झाले आहेत. हजारो मृत शंख शिंपल्यांचा साठाही धरणाच्या पात्रात दिसत असून यंदाच्या दुष्काळाचे हे चित्र अत्यंत भेसूर दिसत आहे. या पाण्याच्या साठ्यावर हजारो जीव जगत असतात. त्यांना वाहत्या पाण्याबरोबर वाहता न आल्याने या शंखांचा तसचे शिंपल्यातील जीवांचा करुन अंत झाल्याने जैवविविधता ( Biodiversity Crisis ) धोक्यात आल्याचे टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी दत्ता कनावटे यांनी घटनास्थळावरुन दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.