T-20 वर्ल्डकप जिंकल्यानतंर टीम इंडिया मायदेशी परतली आणि मुंबईत टीम इंडियाचं दणक्यात स्वागत झाली. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या विजयी मिरवणुकीसाठी मुंबईकरांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. टीम इंडियाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी संध्याकाळपासूनच गर्दी करायला सुरूवात केली होती. टीम इंडियानं जिंकलेला वर्ल्डकप आणि विश्वविजेत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींचा जनसागर उसळला. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईक रस्त्यावर उतरले. ओपन डेकमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघाली. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमारपासून टीम इंडियाच्या प्रत्येक खेडाळूंनं मुंबईकरांचं अभिवादन स्वीकारलं. कधी वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावून तर कधी हातवारे करत आपल्या चाहत्यांचा उत्साह वाढवला. मुंबई विमानतळावरून टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात आली. दुपारपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली. तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनीदेखील आपली अधिक कुमक लावली. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे अशी ही विजयी मिरवणूक निघाली त्यानंतर या मिरवणुकीची सांगता चाहत्यांनी खचाखच भरलेल्या वानखेडेवर झाली. बघा पुढे काय झालं…?