Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!' उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?

दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!’ उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?

| Updated on: Sep 22, 2022 | 7:09 AM

Shiv sena Politics : माझ्यामागे जेव्हा गाड्या लावल्या तेव्हा त्यांच्या जनरल सेक्रेटरींना फोन लावून मी जाब विचारलेलाय. माझ्यामागे गाड्या लावण्याची हिंमत करु नका', असंही ती त्यांना म्हटलंय.

प्रदीप कापसे, प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘जय पराजय मोकळेपणे स्विकारायचा असतो. आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो, त्यामुळे आमच्याकडे खिलाडूवृत्ती आहे. त्यामुळे हरलो तर हरलो म्हणतो आणि जिंकलो तर जिंकलो म्हणतो. कारण आमच्याकडे खिलाडूवृत्ती आहे. पण त्यांच्याकडे खिलाडूवृत्ती नाही’, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Deepak Kesarkar on Uddhav Thackeray) आणि ठाकरे समर्थकांवर टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि सध्याच्या सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना (Shiv Sena Latest News) पक्षप्रमुखांवर टीका केला आहे. ‘इथं दारं खुली आहेत, असं म्हणायचं, आणि पाठीमागून माणसं पाठवायची, याला काय म्हणायचं? माझ्यामागे जेव्हा गाड्या लावल्या तेव्हा त्यांच्या जनरल सेक्रेटरींना फोन लावून मी जाब विचारलेलाय. माझ्यामागे गाड्या लावण्याची हिंमत करु नका’, असंही ती त्यांना म्हटलंय. दरवाजे मोकळे आहेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवायची, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Congress and NCP) दावणीला पक्ष बांधलाय, त्यांनी मेळावा घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवावं, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय. शिवाय उद्धव ठाकरेवर मी काही कमेंट करणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

 

Published on: Sep 22, 2022 07:09 AM