Video | अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले…

आपल्याला ईडी लावल्यापूर्वी आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्याची ऑफर देण्यात आली होती आणि ती जर स्विकारली असती तर त्याचवेळी आघाडी सरकार कोसळले असते असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. आपल्यावर 100 कोटीचा आरोप ठेवून ईडीने अटक केली परंतू चार्जशिटमध्ये प्रत्यक्षात 1 कोटी 71 आरोप ठेवला. त्याचे ही पुरावे दिले नसल्याचे देशमुख म्हणाले.

Video | अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले...
| Updated on: Mar 02, 2024 | 7:42 PM

नाशिक | 2 मार्च 2024 : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओत स्फोटके ठेवण्यात आली होती. या प्रकरणाची आमच्या सरकारने चौकशी केली, तेव्हा या घटनेत नाव पुढे येईल म्हणून त्याच्या स्कॉर्पिओच्या मालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी केली असता मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टर माईंड असून त्यांच्या या प्लानमध्ये सचिन वझे आणि चार एपीआय असल्याचंही आढळून आल्याचा खुलासा माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर आपण परमबीर सिंग यांना निलंबित केले. तर सचिन वाझे यांना काढून टाकले. भाजपातील काही नेत्यांनी या दोघांना एकत्र बोलावून आपल्यावर आरोप करायला लावले, त्यातून परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आपल्यावर केला असल्याचा दावा देशमुख यांनी केला. या प्रकरणात आरोप झाल्यावर आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असे अनिल देशमुख म्हणाले. या प्रकरणात न्या. चांदीवाल आयोग नेमण्यात आला होता. चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन दीड वर्षे झाली, तो अधिवेशनात ठेवला जाईल अशी अपेक्षा होती. परंतू तो अद्याप ठेवलेला नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. परंतू सहा समन्स पाठवून देखील परमबीर कोर्टात हजर झाले नाहीत. चांदीवाल आयोगाच्या अहवाल आल्यानंतर आपण पुढील निर्णय घेऊ असेही देशमुख यांनी सांगितले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.