Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादकाचा वाहतूक खर्चही निघेना, कांद्यावर असे केले विधीवत अंत्यसंस्कार

कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला.

कांदा उत्पादकाचा वाहतूक खर्चही निघेना, कांद्यावर असे केले विधीवत अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 9:57 PM

नाशिक : सध्या अवकाळी पाऊस, गारपिटीने काही भागात त्रस्त केले. याचा फटका पिकांना बसत आहे. कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. सततच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्ण भिजून गेला. बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नव्हता. नैराश्यातून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील युवा शेतकरी योगेश सोनवणे यांनी चक्क शेतात साठवून ठेवलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार केले. ट्रॅक्टरने कांदा शेतात पसरवून नष्ट करीत विधीवत अंत्यविधी करून भावनांना मोकळी वाट करून दिली.

पोटाच्या पोरासारखा जपलेला कांदा पावसाने भिजल्याने शेतकरी अडचणीत आलेत. मायबाप सरकारने किमान शेतकऱ्यांना मदतीची हात देऊन उभे करावे. तसेच काही दिवस सक्तीची वीजबिल आणि कर्ज वसुली तूर्त थांबवून अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी सोनवणे यांनी व्यक्त केली.

१६ एकर बागेतील नुकसान

दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथ काल प्रचंड गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक खराब झालीय. देऊळगाव साकर्शा येथील शेतकरी गणेश गायकवाड यांच्या 16 एकर शेतातली आंबा, चिकू, निंबू, सफरचंद बागेचे अतोनात नुकसान झाले. आंबा फळ आता काढायला आले होते.

हे सुद्धा वाचा

आर्थिक मदतीची मागणी

मात्र रात्रीच्यावेळी अचानक वादळी वारा आणि गारपीट झाली. यामधे आंब्यांच्या फळाला गारपिटीचा फटका बसला. फळ खाली पडली, तर झाडावरील फळांना मार लागल्याने ती खराब झालीत. यामुळे शेतकरी गणेश गायकवाड यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शासनाने त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी गायकवाड यांनी केलीय.

फळबागा उद्धवस्त झाल्याने आता कुणाच्या दारासमोर हात पसरवावे, असा प्रश्न फळबाग उत्पादकाला पडला आहे. सरकारी मदतीकडे शेतकरी आस लावून बसले आहेत.

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.