Latur
लातूर
भाजप
Jalna
जालना
भाजप
Raver
रावेर
भाजप
Dhule
धुळे
भाजप
Nashik
नाशिक
शिवसेना
Palghar
पालघर
शिवसेना
Bhiwandi
भिवंडी
भाजप
Buldhana
बुलढाणा
शिवसेना
Pune
पुणे
भाजप
Madha
माढा
भाजप
Akola
अकोला
भाजप
Beed
बीड
भाजप
Ratnagiri-Sindhudurg
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
शिवसेना
Kalyan
कल्याण
शिवसेना
Mumbai South-Central
मुंबई दक्षिण मध्य
शिवसेना
Amravati
अमरावती
IND-Cong
Yavatmal-Washim
यवतमाळ-वाशीम
शिवसेना
Thane
ठाणे
शिवसेना
Wardha
वर्धा
भाजप
Sangli
सांगली
भाजप
Shirdi
शिर्डी
शिवसेना
Hatkanangle
हातकणंगले
शिवसेना
Ramtek
रामटेक
शिवसेना
Raigad
रायगड
राष्ट्रवादी
Mumbai North
मुंबई उत्तर
भाजप
Jalgaon
जळगाव
भाजप
Mumbai North-West
मुंबई उत्तर-पश्चिम
शिवसेना
Chandrapur
चंद्रपूर
काँग्रेस
Dindori
दिंडोरी
भाजप
Gadchiroli-Chimur
गडचिरोली-चिमूर
भाजप
Mumbai North-East
मुंबई उत्तर-पूर्व
भाजप
Nanded
नांदेड
भाजप
Shirur
शिरूर
राष्ट्रवादी
Satara
सातारा
राष्ट्रवादी
Ahmednagar
अहमदनगर
भाजप
Osmanabad
उस्मानाबाद
शिवसेना
Mumbai South
मुंबई दक्षिण
शिवसेना
Kolhapur
कोल्हापुर
शिवसेना
Mumbai North-Central
मुंबई उत्तर-मध्य
भाजप
Maval
मावळ
शिवसेना
Hingoli
हिंगोली
शिवसेना
Bhandara-Gondiya
भंडारा गोंदिया
भाजप
Nagpur
नागपुर
भाजप
Nandurbar
नंदुरबार
भाजप
Baramati
बारामती
राष्ट्रवादी
Aurangabad
औरंगाबाद
AIMIM
Solapur
सोलापूर
भाजप
Parbhani
परभणी
शिवसेना

लोकसभा निवडणूक 2024

17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग 16 जूनपूर्वी सार्वत्रिक निवडणुका घेईल आणि नवीन सरकार स्थापन होईल. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. तर बहुमतासाठी 272 जागा जिंकणे आवश्यक आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 30हून अधिक राजकीय पक्षांशी युती केली आहे. तर विरोधकांनी 28 पक्षांशी आघाडी करून आपल्या आघाडीला ‘इंडिया आघाडी’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. मात्र, बसपा, बीजेडी, अकाली दलसारख्या पक्षांनी कोणत्याच आघाडीला पाठिंबा दिलेला नाही.

2019मध्ये देशभरात 11 एप्रिलपासून ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला होता. 2019मध्ये देशभरात सुमारे 91.2 कोटी मतदार होते. त्यावेळी 67 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरला होता. या निवडणुकीत भाजपला 37.36 टक्के आणि काँग्रेसला 19.49 टक्के मते मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने लागोपाठ दोनवेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असून आता हॅट्रीक करण्याची तयारी सुरू झाली आहे. तर कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने सुरू केला आहे.

देशात 18 व्या लोकसभेसाठी एप्रिल आणि मे 2024मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या प्रत्येक सभागृहाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. पाच वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक आयोग निवडणुका घेत असतो. संविधान आणि कालमर्यादेचं उल्लंघन होणार नाही, याच हिशोबाने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातात. निवडणुका घोषित झाल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर मतदानाची तारीख असते. उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा हा त्यामागचा हेतू असतो. 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या तारखा पाहिल्या तर 2024च्या एप्रिल-मेमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. मार्च ते मेपर्यंतचा काळ हवामानासाठी अधिक चांगला मानला जातो. यंदाच्या निवडणुका पाच ते सात टप्प्यात होतील, असं सांगितलं जातं.