Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

गेल्या चार महिन्यांपासून बाजारपेठेत केवळ कापूस आणि सोयाबीनचाच बोलबाला होता. खरिपातील या दोन मुख्य पिकांचाच शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून रब्बी हंगामातील हरभऱ्याचाही श्रीगणेशा झाला आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. सध्या पहिल्या पेऱ्यातीलच पिकाची आवक होत असली ती खुल्या बाजारातील दर हे शेतकऱ्यांची निराशा करणारेच आहेत.

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:56 PM

लातूर : गेल्या चार महिन्यांपासून बाजारपेठेत केवळ कापूस आणि सोयाबीनचाच बोलबाला होता. खरिपातील या दोन मुख्य पिकांचाच शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून (Rabi Season) रब्बी हंगामातील (Chickpea Arrival) हरभऱ्याचाही श्रीगणेशा झाला आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. सध्या पहिल्या पेऱ्यातीलच पिकाची आवक होत असली ती (Open Market) खुल्या बाजारातील दर हे शेतकऱ्यांची निराशा करणारेच आहेत. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये सरासरी दर मिळत आहे. तर दुसरीकडे खरिपातील सोयाबीनचे दर हे कासवगतीने वाढत आहे. सोयाबीनला शुक्रावरी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 400 रुपये पोटलीत दर मिळाला. आता रब्बी हंगामातील पिकांचीही आवक सुरु होत असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्षा हमीभाव केंद्राची

रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु झाली आहे. शिवाय सुरवातीच्या काळातच थेट 15 हजार पोते लातूर कृषी उत्पन्न बाजार पेठेत दाखल होत आहेत. असे असले तरी सध्या हरभऱ्याला केवळ 4 हजार 500 रुपये दर मिळत आहे. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 300 रुपये दर निश्चित केला आहे. सध्या हमीभाव आणि खुल्या बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या केवळ पहिल्या टप्प्यातील हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. अजून आठ दिवसांनी दुपटीने आवक होणार आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राची यंत्रणा आणि प्रत्यक्षात सुरवात करण्याची प्रक्रिया पाहता आताच हमीभाव केंद्र सुरु झाले तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

विक्रमी पेऱ्यामुळे आवक कायम राहणार

रब्बी हंगामात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ज्वारी-गहू या मुख्य पिकांकडे पाठव फिरवली आहे. यंदा हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे आवकही त्याचप्रमाणात राहणार आहे. भविष्यात आवक वाढली तर खुल्या बाजारपेठेतील दर अणखीनच कमी होतील. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हमीभाव केंद्राचा आधार शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. सध्या तुरीची हमीभाव केंद्र आहेत पण खुल्या बाजारातील आणि हमीभाव केंद्रावरील दर हे समानच असल्याने शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहेत.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील तूर आणि सोयाबीनची तर आता नव्याने रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा असून शुक्रवारी सोयाबीन 6 हजार 400 तर तुरीला 6 हजार 100 असा दर मिळाला होता. हरभऱ्याची आवक जास्त होत असून 4 हजार 500 रुपये दर आहेत.

संबंधित बातम्या :

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पेरले-उगवले अन् बहरात असतानाच पीक जळून गेले, नेमके मका पिकाबाबत असे झाले तरी काय?

Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.