AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : दुष्काळात तेरावा, लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, कशामुळे ओढावली परस्थिती?

कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर गडगडण्यास सुरवात झाली.

Solapur : दुष्काळात तेरावा, लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, कशामुळे ओढावली परस्थिती?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 21, 2022 | 3:37 PM
Share

सोलापूर : (Change Climate) वातावरणातील बदलामुळे फळांच्या दरात कमालीची घट झाली आहे. (Seasonable Fruit) कलिंगड, खरबूज या हंगामी फळांची बाजारपेठेत आवक वाढत आहे. असे असले तरी हंगामाची सुरवात दणक्यात झाली पण आता या फळांच्या मागणीत घट झाली आहे. यातच मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे तर शुक्रवारी (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या दोन फळांचे तर लिलावच झाले नाहीत. केवळ जांभूळ आणि डाळिंबालाच अधिकची मागणी होती. लिलावच झाले नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दर यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

उत्पन्न सोडा, वाहतूक खर्चही पदरून

कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर गडगडण्यास सुरवात झाली. किलोवर विकले जाणारे कलिंगड आता नगावर विक्री होत आहे.

बाजार समितीमध्ये लिलावच नाहीत

पहाटेपासून आवक झालेल्या शेतीमालाची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 पर्यंत लिलाव होतात. व्यापाऱ्यांकडून मागणी होते व किरकोळ विक्रेत्ये फळे, भाजीपाला घेऊन विकतात. मात्र, मोठ्या प्रमाणात आवक होऊन देखील शुक्रावारी वातावरणातील बदलामुळे लिलावच झाले नाहीत. खरबूज, कलिंगड हे बाजारपेठेतच पडून होते. आतापर्यंत कलिंगड 100 रुपयाला क्रेट तर खरबूज 300 रुपयांना असे दर होत. पण शुक्रावारी बोलीच झाली नाही त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

डाळिंब, जांभळाला मात्र मागणी

कलिंगड, खरबूजाच्या मागणीत घट असली तरी दुसरीकडे जांभूळ आणि डाळिंबाने आपले महत्व बाजारपेठेत टिकवून ठेवले आहे. यंदा डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामात मागणी होत आहे. पिन होल बोरर या किडीमुळे डाळिंबाचे क्षेत्र घटले असून आता उत्पादीत मालाला मागणी आहे. तर जाभळाचे उत्पादन घटल्यामुळे शहरी भागात अधिकची मागणी होत आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.