Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका

हंगाम कोणताही असो त्यावर वातावरणाचा परिणाम हा ठरलेला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन करुनही वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांचे प्रयत्न तर व्यर्थ ठरत आहेतच पण आर्थिक नुकसानही होऊ लागले आहे. मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेने कमालीचा पारा गाठला आहे. यामुळे पिकांनी तर माना टाकल्या आहेतच पण चिंतेची बाब ही आहे की मुबलक पावसामुळे तुडुंब भरलेले जलस्त्रोतांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे ठिबंक सिंचनाचा आधार घेऊनही पिकांना देणे मुश्किल होत आहे.

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:15 AM

औरंगाबाद : हंगाम कोणताही असो त्यावर वातावरणाचा परिणाम हा ठरलेला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन करुनही (Change Climate) वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांचे प्रयत्न तर व्यर्थ ठरत आहेतच पण आर्थिक नुकसानही होऊ लागले आहे. (Marathwada) मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेने कमालीचा पारा गाठला आहे. यामुळे (Crop Damage) पिकांनी तर माना टाकल्या आहेतच पण चिंतेची बाब ही आहे की मुबलक पावसामुळे तुडुंब भरलेले जलस्त्रोतांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे ठिबंक सिंचनाचा आधार घेऊनही पिकांना देणे मुश्किल होत आहे. उन्हाळी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असतानाच ही परस्थिती ओढावल्याने उत्पादन घट होणार आहे. त्यामुळे खरीप काय अन् रब्बी हंगाम काय शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

उन्हाळी हंगामातील या पिकांना फटका

शेतकऱ्यांनी मुबलक पाण्याच्या जीवावर यंदा पीक पध्दतीमध्ये बदल केला. शिवाय उत्पादनवाढीसाठी कृषी विभागानेही यासंदर्भात जनजागृती केली होती. त्यामुळेच यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीन, मका या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती. सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने त्याला सातत्याने पाणीपुरवठा होणे गरजेच आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिकांची जोपासणा केली पण अंतिम टप्प्यात वाढते ऊन यामुळे पीके ही माना टाकत आहेत. त्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. मराठवाड्यात सोयाबीन, मका, उन्हाळी कांदा याचा प्रयोग शेतकऱ्यांनी प्रथमच केला होता. मात्र, आता पदरी काय पडणार हे पहावे लागणार आहे.

कांदा पोसण्यापूर्वीच काढण्याची नामुष्की

यंदा सोयाबीन पाठोपाठ उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कांदा दरात चढ-उतार होत असले तरी शेतकरी या हंगामी पिकाचा प्रयोग करतोच. पण उन्हाळी कांदा बाजारपेठेत जाण्यापूर्वीच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे कांदा पात 10 ते 15 दिवस अगोदरच वाळली आहे. शिवाय याचा कांदा पोसण्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. अशा अवस्थेत पाण्याचे नियोजन महत्वाचे असताना शेतकरी विजेचा लपंडाव आणि घटलेला पाणीसाठा यामुळे हतबल झाला आहे.

काय आहे शेतकऱ्यांसमोर पर्याय?

सध्या गहू, हरभरा, ज्वारी या मुख्य पिकांची काढणी झालेली आहे. शेत शिवारात सोयाबीन, कांदा आणि मक्यासारखी मोजकी पिके उभा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. शिवाय स्प्रिंक्लर, ठिबकच्या वापरावर भर देऊन पिकांना दिवसा पाणी न देता रात्रपाळीने पाणी देणे महत्वाचे आहे. यामुळे पाण्याचा योग्य वापर होणार आहे. उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन आहे. पावसाळी पीक असल्याने अधिकचे पाणी लागते. आता अंतिम टप्प्यातच जर नियोजन कोलमडले तर याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.