Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : सततच्या पावसामुळे साठवलेल्या धान्यालाही फुटले कोंब, उभ्या पिकाचे सोडा आहे त्याची सुरक्षितता महत्वाची

आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच होते पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिले आहे. त्यामुळे पिके तर पाण्यात आहेतच पण ज्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करुन ठेवला आहे. त्यांचेही नुकसान होऊ लागले आहे.

Bhandara : सततच्या पावसामुळे साठवलेल्या धान्यालाही फुटले कोंब, उभ्या पिकाचे सोडा आहे त्याची सुरक्षितता महत्वाची
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 3:33 PM

भंडारा :  (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसागणीस येत आहे. आतापर्यंत पावसामुळे (Crop Damage) उभ्या पिकांना धोका होता. शेत शिवरात पाणी साचल्याने वाढ तर खुंटली होतीच पण शेत जमिनही खरडून गेल्या आहेत. हे कमी म्हणून की काय शेतकऱ्यांनी ज्या (Stock of food grains) अन्नधान्याचा साठा केला होता त्यालाही कोंब फुटले आहेत. सामान्यत: प्रत्येक कुटुंब वर्षभर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न धान्य साठवून ठेवतो. मात्र, अतिवृष्टिने या साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तांदूळ,गहू,डाळ रोजच्या उपयोगी वस्तूचे पाण्यामुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

100 कुटुंबामध्ये अन्नधान्याचा प्रश्न

आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच होते पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिले आहे. त्यामुळे पिके तर पाण्यात आहेतच पण ज्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करुन ठेवला आहे. त्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. गव्हाला थेट कोंब फुटु लागले आहेत. त्यामुळे आता साठवलेल्या धान्यातून उत्पन्न तर सोडाच पण वर्षभर उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो की नाही अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

सडलेले धान्य थेट जनावरांपुढे

अतिवृष्टि ने या साठवून ठेवलेल्या अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तांदूळ, गहू, डाळ रोजच्या उपयोगी वस्तूचे पाण्यामुळे नुकसान झाले आहेत. सतत पाण्यात राहल्याने अन्न धान्याला कोंब निघाले आहेत. आता हे सडलेले अन्नधान्य खाण्यायोग्य नसल्याने केवळ जनावराच्या उपयोगी येत आहे. हा प्रकार एका- दुसऱ्या घरात घडला नसून मोहाडी तुमसर तालुक्यातील 100 च्या वर कुटुंबावर हे संकट आले आहे. अनेक लोंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आता मायबाप सरकार ने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मोहाडी तालुक्यात सर्वाधिक फटका

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असला तरी सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाला असे नाही. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठी तफावत आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामध्ये धान पिकाचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनही खरडून गेली आहे. संपूर्ण शेती ही रेतीमय झाली आहे. तब्बल 100 एकर शेती पुराचा गाळ आल्याने पीके गाळाली खाली आली आहे. कधी नव्हे ते हंगामाच्या सुरवातीलाच असे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.