वाशिममधील खरबूज विक्रीसाठी थेट जम्मू काश्मीरला, शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फायदा

मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण २० टनांचे खरबूज निघाले आहेत, तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पादन होणार आहे.

वाशिममधील खरबूज विक्रीसाठी थेट जम्मू काश्मीरला, शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फायदा
watermelonImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 2:57 PM

वाशिम : शेती (agricultural news) परवडत नाही अशी सगळीकडेच ओरड होत असताना, काही शेतकरी मात्र सेंद्रिय शेतीची कास धरत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. असाच प्रयोग वाशिमच्या राधेश्याम मंत्री यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची (water melon) लागवड केली. आज ८२ दिवसांनी या खरबुजची तोडणी होत आहे. पण मंत्री यांनी हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला (jammu kashmir) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून त्यांना थेट शेतातून १७ रुपये प्रतिकिलो एव्हडा दर मिळाला आहे. जर स्थानिक बाजारात विक्री केली असती, तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता.

ट्रक जम्मू काश्मीरला रवाना

मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण २० टनांचे खरबूज निघाले आहेत, तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पादन होणार आहे. आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर टोतावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कार

मंत्री यांनी याच शेतात रेड अँपल बोराचीही लागवड केली आहे. मात्र झाडं सध्या लहान असल्याने आंतरपीक म्हणून पावसाळ्यात सोयाबीन आणि आता खरबुजाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतं किंव्हा कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही, तर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने खरबूज पिकविल्याने त्याची चवही अत्यंत गोड आहे. राधेश्याम मंत्री हे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. त्यासाठी त्यांना २०१८ साली महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कारही मिळाला आहे. मंत्री आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात, सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियम लागवड, विक्रमी उत्पादन येणारे बेडवरील सोयाबीन, गोपालनातून संपूर्ण शेतीचे सेंद्रियकरण करून त्यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतले आहे. पारंपरिक पिकांना बगल देत बाजारात मागणी असलेल्या पिकांचे उत्पादन घेतले. त्याला नियोजनाची जोड देऊन योग्य बाजारपेठेत विक्री केली तर कमी कालावधीत चांगले उत्पन्न घेता येते हे राधेश्याम मंत्री यांनी दाखवून दिले आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.