तापमान वाढतंय… गव्हाचे उत्पादन घटले, तर अन्नसुरक्षेचं काय होणार?
वाढत्या उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे, ज्यामुळे अन्नसुरक्षेचे संकट निर्माण होऊ शकते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मार्च ते मे दरम्यान देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा अंदाज सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .मार्चपासूनच उष्णतेची लाट (हीटवेव्ह) नोंदवली जाऊ शकते. हवामान बदलाच्या परिणामामुळे गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सरासरी तापमान सामान्यपेक्षा जास्त राहात आहे. हवामानाच्या प्रभावामुळे गेल्या चार वर्षांपासून गव्हाच्या किमती उच्च स्तरावर आहेत. तसेच 125 वर्षांत यावर्षीचे फेब्रुवारीचे सरासरी तापमान सर्वाधिक नोंदवले गेले आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिल्यास गव्हाच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जास्त उष्णतेमुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशपासून मध्य भारत आणि दक्षिणेतील काही राज्यांपर्यंत गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने मार्च महिन्यात वाढणाऱ्या तापमानाचा विचार करून शेतकऱ्यांसाठी सल्लागार सूचना (ॲडव्हायजरी) लागू केली आहे. संस्थेचे संचालक, डॉ. रतन तिवारी, यांच्या मते, मार्च महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असून, सध्या सरासरी तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. त्यामुळे उत्पादनाबाबत कोणताही निष्कर्ष काढणे सोपे जाईल. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील वाढती उष्णता गव्हाच्या पिकासाठी हानिकारक ठरू शकते. या कालावधीत गव्हाच्या कणसामध्ये दाणे भरू लागतात, परंतु तीव्र उष्णतेमुळे ते लवकर सुकतात आणि लहान राहतात, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सल्लागार सूचना लागू करण्यात आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे देशातील 573 ग्रामीण जिल्ह्यांमधील शेती धोक्यात येऊ शकते. 2020 ते 2049 या कालावधीत, 256 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 1 ते 1.3 अंश सेल्सियसने वाढू शकते, तर 157 जिल्ह्यांमध्ये ही वाढ 1.3 ते 1.6 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. याचा गहू शेतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर मेज अँड व्हीट रिसर्चचे कार्यक्रम संचालक डॉ. पी. के. अग्रवाल यांच्या संशोधनानुसार, तापमानात एका अंशाने वाढ झाल्यास गव्हाचे उत्पादन 4 ते 5 दशलक्ष टनांनी घटू शकते. जर तापमान 3 ते 5 अंशांनी वाढले, तर उत्पादनात 19 ते 27 दशलक्ष टनांपर्यंत मोठी घट होऊ शकते.
ICAR अंतर्गत असलेल्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायलँड अॅग्रीकल्चरचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह यांच्या मते, फेब्रुवारी आणि मार्चमधील वाढणारे तापमान गव्हाच्या उत्पादनावर थेट परिणाम करते. हा परिणाम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे सिंचन करावे, ज्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि पीक अधिक काळ आर्द्र राहते.हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. वेळेवर किंवा लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकात धान्य तयार होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांचे नुकसान कमी होते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जास्त नुकसान सहन करावे लागू शकते.तसेच, गव्हाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी पेंढ्याची मल्चिंग करावी. यामुळे मातीतील आर्द्रता टिकून राहते आणि फेब्रुवारी व मार्चमधील वाढत्या तापमानाचा प्रभाव कमी होतो.
हवामान बदलामुळे होणाऱ्या अवकाळी पावस आणि वाढत्या उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनात 23 टक्के घट होऊ शकते, तसेच त्याच्या चवीत बदल होण्याची शक्यता आहे.माजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलामुळे गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मते, स्थानिक आणि तात्पुरत्या हवामान बदलांमुळे 2050 पर्यंत उत्पादनात 19.3 टक्के आणि 2080 पर्यंत 40 टक्के घट होऊ शकते.याशिवाय, खरीप मका उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, 2050 पर्यंत 18 टक्के आणि 2080 पर्यंत 23 टक्के घट होऊ शकते.
अलीकडेच सरकारने हवामान बदलाचा विचार करून 109 सुधारित वाणांचे बियाणे बाजारात आणले आहेत. आता अशी नवीन वाणे विकसित केली जात आहेत, जी दुष्काळ किंवा पुरासारख्या अत्यधिक हवामान बदलांमध्येही टिकून राहू शकतील, त्यामुळे पिकाचे संपूर्ण नुकसान होणार नाही. यासोबतच, धान्यातील पोषणमूल्ये वाढवण्यावरही भर दिला जात आहे.गव्हाच्या उत्पादनावर 37°C पेक्षा जास्त तापमानाचा मोठा परिणाम होतो. तापमानवाढीमुळे दाणे भरण्याच्या टप्प्यावर ताण येतो, ज्यामुळे फसलाची परिपक्वता लवकर होते आणि परिणामी उत्पन्नात घट होते. हा तापमान ताण कमी करण्यासाठी संरक्षण शेतीसारख्या मृदा आर्द्रता टिकवण्याच्या तंत्रांचा अवलंब करावा.उत्तर भारतातील उष्णतेला प्रतिरोधक गव्हाच्या वाणांना प्राधान्य द्यावे, जसे की HD 85, HD 3410, HD 3390, HD 3386 आणि HD 3388. तसेच, दाणे भरण्याच्या काळातील तापमान ताण टाळण्यासाठी, योग्य वाणांसह 25 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान लवकर पेरणी करणे फायदेशीर ठरेल.
गव्हातील पोषक तत्वांची कमी, चवेतही बदल
भारतीय कृषी संशोधन संस्था आणि विधान चंद्र कृषी विद्यापीठ, पश्चिम बंगाल यांच्याशी संबंधित विविध संस्थांच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात गहू आणि तांदळातील पोषणमूल्यांमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अभ्यासाशी संबंधित संशोधक सोवन देबनाथ यांच्या मते, गहू आणि तांदळातील आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण गेल्या 50 वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटले आहे. विशेषतः झिंक आणि लोह (आयर्न) यांची कमतरता वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांचे आव्हान – अनियमित तापमान वाढीमुळे घटते उत्पादन
देवरिया जिल्ह्यातील भलुअनीचे शेतकरी मार्कंडेय सिंहह्याच्या माहिती नुसार गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे गव्हाच्या दाण्यांवर परिणाम झाला. दाणे बारीक झाले आणि सुकले परिणामी उत्पादन घटले. सामान्य परिस्थितीत प्रति एकर 18 क्विंटल उत्पादन मिळत असते, मात्र वाढत्या उष्णतेमुळे हे घटून 10 ते 12 क्विंटलवर आले. जर यावर्षीही तापमान वाढले, तर उत्पादनात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. पटौदीतील शेतकरी अनूप सिंह यांच्या मते, गेल्या तीन वर्षांपासून अनियमित वाढलेल्या तापमान आणि अनियमित पावसामुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. जास्त उष्णतेमुळे अधिक पाणी द्यावे लागत असूनही, उत्पादनात सुमारे 25 टक्के घट झाली आहे.
मध्य प्रदेशातील सर्वाधिक उष्ण भागांपैकी एक असलेल्या खरगोन जिल्ह्यातील शेतकरी खेमराज बिड़ला यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. गव्हाच्या योग्य परिपक्वतेसाठी थंड हवामान आणि आर्द्रता आवश्यक असते, मात्र फेब्रुवारीपासून तापमान वाढू लागल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.यामागे विविध वैज्ञानिक कारणे असू शकतात, पण स्पष्ट दिसणारी बाब म्हणजे तीव्र उष्णतेमुळे गव्हाचे दाणे पूर्णपणे विकसित होत नाहीत, आणि परिणामी उत्पादन घटते.
2050 पर्यंत गव्हाच्या उत्पादनात 23 टक्क्यांची घट होण्याची शक्यता
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) विकसित केलेल्या इन्फोक्रॉप व्हीट मॉडेलच्या मदतीने वैज्ञानिकांनी गव्हाच्या उत्पादनातील प्रादेशिक तफावतीचे विश्लेषण केले. या अभ्यासानुसार, हवामान बदलामुळे 2050 पर्यंत भारतातील गव्हाचे उत्पादन 6% ते 23% आणि 2080 पर्यंत 15% ते 25% पर्यंत घटण्याची शक्यता आहे.तसेच, वैश्विक (GCM MIROC3.2.HI) आणि प्रादेशिक हवामान मॉडेल्स (RCM-PRECIS) देखील दर्शवतात की हवामान बदलाचा गव्हाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र, हा प्रभाव भौगोलिकदृष्ट्या भिन्न असेल, आणि अभ्यासानुसार मध्य व दक्षिण-मध्य भारतातील गव्हाचे उत्पादन सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे
शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेले मार्गदर्शक सूचना
गव्हाच्या पिकाला पाणी देताना वाऱ्याचा वेग कमी असावा, विशेषतः संध्याकाळच्या वेळी सिंचन केल्यास पिके पडण्याचा धोका कमी होतो.जर तापमान तीन दिवसांहून अधिक काळ सातत्याने वाढत असेल, तर फुलोऱ्यानंतर 200 लिटर पाण्यात 400 ग्रॅम क्यूरेट ऑफ पोटॅश मिसळून फवारणी करावी.
उष्णतेच्या तणावाचा प्रभाव कमी करण्यासाठी, फुलोऱ्यानंतर 200 लिटर पाण्यात 4 किलो पोटॅशियम नायट्रेट मिसळून फवारणी करावी.दक्षिण हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तरी भागात, जास्त तापमान असलेल्या दिवसांत दुपारी 2 ते 2.30 दरम्यान एका तासासाठी स्प्रिंकलरद्वारे सिंचन करणे फायदेशीर ठरू शकते.