Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | हे काय भलतंच? केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप? नांदेडमधल्या येळेगावकरांना कसली ही भीती?

केळीऐवजी येथील शेतकरी ऊस, हळद अशी पिके घेतात. पण केळी लागवडीची हिंमत कुणीही करत नाही. काही शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला असता त्या कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरणं असल्याचा दावा इथले शेतकरी करत आहेत.

Nanded | हे काय भलतंच? केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप? नांदेडमधल्या येळेगावकरांना कसली ही भीती?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:45 PM

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur Banana) केळीची ख्याती दूरदूरवर पसरली आहे. इथले बहुतांश शेतकरी केळीची लागवड करतात. पण याच तालुक्यात असंही एक गाव आहे, ज्या गावचे शेतकरी केळीचं पिक (Banana Crop) घेण्यासाठी घाबरतात. किंबहुना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केळीचं पिक घेतलेलंच नाही. केळीचं पिक घेतलं तर त्या शेतकऱ्यावर ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो, अशी भीती गावकऱ्यांना आहे. दर्जेदार केळी उत्पादनासाठी अर्धापूर तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र याच तालुक्यातील एक अख्खं गाव या ओळखीपासून वंचित आहे. त्यांनी केळीपिकापासून स्वतःला दूर ठेवलंय.

येळेगावकरांची व्यथा काय?

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूत तालुक्यात येळेगाव आहे. येळेगावात श्री ब्रह्मदेवाचे देववस्थान आहे. गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाखाली शेकडो वर्षांपूर्वी पासून ब्रह्मदेवाचे स्थान आहे. या देवस्थानच्या अनेक आख्यायिका गावात सांगितल्या जातात. केळीची लागवड केल्यास गावातील ग्रामदैवत असलेल्या ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो आणि केळीची लागवड करणाऱ्या शेतकरी कुटूंबाचा सर्वनाश होतो ही त्यापैकीच एक आख्यायिका. त्यामुळेच केळी उत्पादसाठी अनुकुल वातावरण असूनही येळेगावचे लोक मात्र हे पिक घेऊ शकत नाहीत.

Nanded yelegaon

हे सुद्धा वाचा

मंदिर बांधण्यासही धजावत नाहीत…

गावाचे दैवत ब्रह्मदेव असल्याने त्याचे मंदिर बांधण्याची अनेकांची इच्छा झाली. कारण ब्रह्मदेवाचे स्थान एका लिंबाच्या झाडाखाली आहे. अनेकांनी आतापर्यंत मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. जो कुणी मंदिर बांधेल, त्या मंदिराच्या शिखरावरून गोदावरी नदीचे पाणी दिसले पाहिजे, असं म्हणत ब्रह्मदेव त्या व्यक्तीच्या स्वप्नात येतात, अशीदेखील आख्यायिका आहे. त्यामुळए कुणीही हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला नाही. गोदावरी नदी येळेगावापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे.

अनेकांनी जमिनी विकल्या

येथील चित्र-विचित्र आख्यायिका ऐकून अनेक शेतकऱ्यांनी बाहेर गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकल्या. बाहेरगावच्या शेतकऱ्यांनीही शेती घेऊन येळेगावच्या शिवारात केळी लावण्याचा प्रयत्न केला नाही. केळीऐवजी येथील शेतकरी ऊस, हळद अशी पिके घेतात. पण केळी लागवडीची हिंमत कुणीही करत नाही. काही शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला असता त्या कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरणं असल्याचा दावा इथले शेतकरी करत आहेत.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.