Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर शेतकऱ्यांची थट्टाच… अनुदानानंतर कांद्याला एका किलोला चाराण्याचा भाव, चांदी कुणाची?

एकीकडे कांद्याचे अनुदान जाहीर करूनही मिळेल की नाही, याची शाश्वती नसताना दुसरीकडे मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जातोय.

ही तर शेतकऱ्यांची थट्टाच... अनुदानानंतर कांद्याला एका किलोला चाराण्याचा भाव, चांदी कुणाची?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 3:29 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे मागील काही दिवसांपूर्वी कांद्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्याचा लाभ मिळावा यासाठी सध्याच्या घडीला अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे अनुदानानंतरही कांद्याचे दर गडगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी कांद्याच्या दराला प्रति किलो अवघे 25 पैसे किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ‘ही’ थट्टाच केली जात असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्या पोटच्या पोराप्रमाणे शेतमालाला जपलं होतं. मात्र बाजार भाव तेजीत राहतील अशी स्थिती असतांना आता उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले गेल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे ठिकठिकाणी बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांद्याला अनुदान जाहीर करावे अशा स्वरूपाची मागणी केली होती.

या मागणीला राज्य सरकारला अक्षरशः झुकावे लागले आणि सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची वेळ आली. हे अनुदान जाहीर करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मर्यादित कालावधीमध्ये विकल्या गेलेल्या कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल असे अनुदान जाहीर केले होते.

हे सुद्धा वाचा

यानंतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कमीत कमी पाचशे रुपये अनुदान द्यावे अशा स्वरूपाची मागणी करत सभागृहातून बाहेर पडले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांनी तीनशे रुपये अनुदान देऊन सरकारने जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा त्यामध्ये बदल करून तीनशे रुपयांवरून साडेतीनशे रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचं घोषित केलं होतं. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे चित्र असताना दुसरीकडे ई पीक पेऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या नोंदी नसल्याने लाभा पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे साधे फोन असल्याने ते ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावर ई पीक पेऱ्याची नोंद करू शकलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना सानुग्रह अनुदानाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे, अशी परिस्थिती असताना दुसरीकडे बाजार समितीत वाईट परिस्थिती आहे.

मर्यादित काळातच कांदा विक्री केल्यास अनुदान मिळणार असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करण्यासाठी बाजार समितीत धाव घेतली आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांद्याचे दर अवघे प्रति किलो 25 पैसे एवढ्यावर येऊन ठेपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला दर नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने समुग्रह अनुदानाच्या संदर्भात जाहीर केलेला निर्णय चुकीच्या वेळेला घेतला गेला का ? अशा स्वरूपाचा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना.
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले...
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले....
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.