PM Kisan : मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे

| Updated on: Jul 30, 2023 | 6:19 PM

PM Kisan : पीएम किसान योजनेत आता महत्वाचा बदल होणार आहे. त्याचा भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरेल. काय आहे हा बदल..

PM Kisan : मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे
Follow us on

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने (PM Kisan Installment) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली. पण आता या योजनेत महत्वाचा बदल होणार आहे. . त्याचा भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरेल. काय आहे हा बदल..

काय होणार बदल

पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावर्षी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा जागर होत आहे. केंद्र सरकार या योजनेत मोठा बदल करणार आहे. Money9 च्या सूत्रानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी या योजनेत 2000 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतकी होईल रक्कम

सध्या या योजनेत दरवर्षी जवळपास साडे आठ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात. 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 8000 रुपये जमा होतील.

यापूर्वी पण चर्चा

यावर्षी जानेवारी महिन्यात पण याविषयी चर्चा रंगली होती. केंद्र सरकार फेब्रुवारी 2023 पासून जादा हप्त्याची तरतूद करेल असा दावा करण्यात येत होता. केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करण्यात येणार होती. पण आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

बजेट पण तयार?

या योजनेत आणखी एक हप्ता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने योजनेचा 14 वा हप्ता जमा केला. केंद्र सरकारने जवळपास 17 हजार कोटी रुपये खर्च केले.

योजनेला झाले पाच वर्षे

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो.

या शेतकऱ्यांना नाही लाभ

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.