Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, काडणीला आलेली पीकं खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.

या जिल्ह्यात पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान, काडणीला आलेली पीकं खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 8:22 AM

धुळे : धुळे (DHULE) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे चारशे एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Damage crops) झाले आहे. दोन तालुक्यात सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिदखेडा या दोन्ही तालुक्यात रब्बी पिकांना त्याचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास फिरवून गेला आहे. काल झालेल्या पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील काही भागांना याचा फटका बसला. यात गहू, हरभरा, केळी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर (SHIRPUR) तालुक्यात साधारण दोनशे हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला असून वीस लाखाचे नुकसान झाले आहे.

तीन बैलांचा मृत्यू

वीज पडल्याने तीन बैलांचा मृत्यू देखील झाला आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे हे गुरुवार नंतर होणार आहे. कारण होळी धुलीवंदन या सणांची सुट्टी असल्याने हे पंचनामे गुरुवारपासून सुरू होतील असा अंदाज आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, केळीच्या फळबागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. केळीच्या बागांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अनेक ठिकाणी तूरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.

हे सुद्धा वाचा

मालेगाव शहरात मुसळधार

विजाचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने मनमाड शहर परिसराला काढले झोडपून काढले. सुरुवातीला झाला जोरदार पाऊस त्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात साचले आहे. गहू, कांदा, हरभरा यासह इतर पिकांचे झाले मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.