Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable : टोमॅटो ‘लालेलाल’, दराच्या तुलनेत पेट्रोलशी स्पर्धा, शेतकरी मात्र त्रस्तच

पालेभाज्याची आवक घटली की मागणी वाढते आणि त्याचा परिणाम थेट दरावर होतो. तेच यावेळी टोमॅटोच्या बाबतीत झाले आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे.

Vegetable : टोमॅटो 'लालेलाल', दराच्या तुलनेत पेट्रोलशी स्पर्धा, शेतकरी मात्र त्रस्तच
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 5:20 PM

मुंबई : टोमॅटोचे देखील कांद्याप्रमाणेच आहे. घसरत्या दरामुळे त्याचा कधी लाल चिखल होतो तर उत्पादनात घट झाल्यावर (Tomato Rate) टोमॅटो असा काय भाव खातो की त्याची तुलना थेट दिवसाकाठी दरात वाढ होत असलेल्या (Petrol Rate) पेट्रोलशीच केली जाऊ लागते. सध्या वाढत्या दरामुळे टोमॅटो लालेलाल झाला आहे. 10 दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये किलोवर असलेला टोमॅटोने आता शंभरी पार केली आहे. त्यामुळे रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर करावा की नाही इथपर्यंत विषय पोहचलेला आहे. गतवर्षी घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीचेही कष्ट घेतले नव्हते तर यंदा (Mumbai Market) बाजारपेठेतच नाही तर शेतामध्येही टोमॅटो पाहवयास मिळत नाही अशी स्थिती आहे. उत्पादनात घट आणि वाढलेली मागणी यामुळे दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना नसून व्यापाऱ्यांना होत आहे.

15 दिवसांमध्ये दरात तिपटीने वाढ

पालेभाज्याची आवक घटली की मागणी वाढते आणि त्याचा परिणाम थेट दरावर होतो. तेच यावेळी टोमॅटोच्या बाबतीत झाले आहे. दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. शिवाय वातावरणातील बदलामुळे आहे ते उत्पादनही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे. वाढती मागणी घटलेला पुरवठा यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये दरामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. 10 दिवसांपूर्वी टोमॅटो 30 रुपये किलो होता तर आता 110 रुपये किलो.

शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांचा फायदा

भाजीपालाच नव्हे तर इतर शेतीमालाच्या दरात वाढ झाली तरी थेट शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल असे नाही. कारण ग्राहक आणि शेतकऱी यांच्यातील मध्यस्तीची भूमिका निभवणाऱ्या व्यापाऱ्यांचाच अधिकचा फायदा होत आहे. कमी आवक असल्याने बाजारपेठेत टोमॅटोचा कृत्रिम तुटवडा तर मागणी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जाते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सध्या दरवाढीचा गाजावाजा होत असला तरी खरी मिळगत ही व्यापाऱ्यांचीच आहे शेतकऱ्यांची नाही.

हे सुद्धा वाचा

आवकवर दराचे भवितव्य अवलंबून

सध्या राज्यभरातील मुख्य बाजारपेठेत टोमॅटोची आवक मागणीपेक्षा कमी होत आहे. शिवाय यावरच टोमॅटोच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे. आता उत्पादन घटले असले तरी भविष्यात आवक वाढली तरच दरात घसरण होईल असा अंदाज व्यापारी राहुल मुंढे यांनी व्यक्त केला आहे. वातावरणातील बदलाचा फटका आता उत्पादनावर झाल्यावर दर वाढतील असाच व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.