Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. साठवणूक केलेले सोयाबीनही आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना चिंता आहे ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपसणा केली आहे. असे असताना आता दरात झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. खरिपात उत्पादनात घट झाली तर आता घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

Latur Market : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची
सलग चौथ्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे.
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 1:46 PM

लातूर : गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाच्या दरात सुरु झालेली घसरण ही कायम आहे. तूर आणि हरभऱ्यापेक्षा (Soybean Rate) सोयाबीनचे दर झपाट्याने घसरत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने साठवणूक केली होती त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीनची आवक ही अंतिम टप्प्यातील आहे. त्यामुळे सध्याच्या घटत्या दराबरोबरच (Summer Season) उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सोयाबीनच्या मागणीत घट झाल्याने ही परस्थिती ओढावली आहे. सोयाबीन प्रमाणेच तूर आणि हरभऱ्याच्या दरात घसरण होत आहे. सोयापेंडच्या आयातीमुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढले तरी फायदा काय?

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. साठवणूक केलेले सोयाबीनही आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना चिंता आहे ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपसणा केली आहे. असे असताना आता दरात झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. खरिपात उत्पादनात घट झाली तर आता घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच दरात होत असलेली घट शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरणार आहे.

गेल्या 8 दिवसांमध्ये शेतीमालाच्या दरात घसरण

केवळ सोयाबीनच्या दरात घसरण नव्हे तर तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरातही घसरण सुरुच आहे. आठ दिवसांपूर्वी सोयाबीन हे 7 हजार 200 रुपयांवर स्तिर होते तर हरभरा आणि तूर हे हमीभावाच्या बरोबरीने. असे असताना केंद्र सरकारच्या काही निर्णयामुळे सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे. तर हरभऱ्याची आवक वाढल्याने दर 4 हजार 500 वर येऊन ठेपला आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची

शेतीमालाच्या दरात घसरण सुरु असली तरी आवक ही सुरुच आहे. शेतकरी आता सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत नाही तर आहे ते सोयाबीन विक्री करण्याच्या भूमिकेत आहे. शिवाय तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घसरण होत असताना आवक ही सुरुच आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काही दिवस साठवणूक करुन दरवाढीची प्रतिक्षा करणे गरजेचे आहे. उर्वरीत सोयाबीनचे नाही पण उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.