AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे.

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी 'ही' वेळ
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे टॅकरने विकतचे पाणी घेऊन पिकांना द्यावे लागत आहे.
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 3:08 PM
Share

लासलगाव: फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून (Crop) पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता (Water Supply) पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे. राजापूर सह परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने टँकर ने पाणी विकत घेऊन कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु झाली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सर्वकाही पोषक आहे असे म्हणता येणार नाही. विकतच्या पाण्यावर शेतकऱ्यांना कांद्याची जोपासणा करवी लागत आहे.

एका टॅंकरसाठी 3 हजार रुपये

येवला तालुक्यातील पुर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण तसे कमीच असते. मात्र, यंदा सरासरी एवढा पाऊस झाल्याने ही नामुष्की फेब्रुवारी महिन्यातच उद्भवेल असे वाटत नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून अचानक विहिरींनी तळ गाठला आहे. आणि एकदा तळ गाठला की पुन्हा पाणीपातळीत वाढ होत नाही हे ठरलेलेच आहे. त्यामुळे राजापूर,ममदापुर ,देवदरी या पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता 25 हजार लिटरचा टॅंकर 3 हजार रुपये प्रमाणे विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कांद्याबरोबर जनावरांच्या पिण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. जनावरांची तहानही विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.

उन्हाळा सुरु होताच ओढावते ही परस्थिती

येवला तालुक्यातील पुर्वेकडील भाग हा दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातो. असे असले तरी अधिकचे उत्पन्न मिळावे या आशेने शेतकरी कांदा लागवड करतात. लागवडीपासून पाण्यापर्यंतच्या बाबीसाठी शेतकऱ्यांना पैसेच मोजावे लागत आहेत. त्यामुळे कांदा पीक पदरी पडले तरी विक्रीपूर्वीच अधिकचा खर्च झालेला असतो. आता उन्हाळ्याची चाहूल लागताच परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे.

सर्वकाही कांदा पिकासाठी

लासलगाव ही कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठ आणि कांद्याचे वाढते दर यामुळे शेतकरी कांद्याशिवाय दुसरे पीक घेत नाहीत. यंदा समाधानकारक पावसामुळे पाणी टिकून राहिल असा आशावाद होता पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच असून आता पासूनच विकतच्या पाण्यावर पीक जोपासावे लागत आहे. त्यामुळे पीक पदरी पडण्यापूर्वीच अधिकचा खर्च या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.