Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे.

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी 'ही' वेळ
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे टॅकरने विकतचे पाणी घेऊन पिकांना द्यावे लागत आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:08 PM

लासलगाव: फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून (Crop) पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता (Water Supply) पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे. राजापूर सह परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने टँकर ने पाणी विकत घेऊन कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु झाली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सर्वकाही पोषक आहे असे म्हणता येणार नाही. विकतच्या पाण्यावर शेतकऱ्यांना कांद्याची जोपासणा करवी लागत आहे.

एका टॅंकरसाठी 3 हजार रुपये

येवला तालुक्यातील पुर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण तसे कमीच असते. मात्र, यंदा सरासरी एवढा पाऊस झाल्याने ही नामुष्की फेब्रुवारी महिन्यातच उद्भवेल असे वाटत नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून अचानक विहिरींनी तळ गाठला आहे. आणि एकदा तळ गाठला की पुन्हा पाणीपातळीत वाढ होत नाही हे ठरलेलेच आहे. त्यामुळे राजापूर,ममदापुर ,देवदरी या पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता 25 हजार लिटरचा टॅंकर 3 हजार रुपये प्रमाणे विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कांद्याबरोबर जनावरांच्या पिण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. जनावरांची तहानही विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.

उन्हाळा सुरु होताच ओढावते ही परस्थिती

येवला तालुक्यातील पुर्वेकडील भाग हा दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातो. असे असले तरी अधिकचे उत्पन्न मिळावे या आशेने शेतकरी कांदा लागवड करतात. लागवडीपासून पाण्यापर्यंतच्या बाबीसाठी शेतकऱ्यांना पैसेच मोजावे लागत आहेत. त्यामुळे कांदा पीक पदरी पडले तरी विक्रीपूर्वीच अधिकचा खर्च झालेला असतो. आता उन्हाळ्याची चाहूल लागताच परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे.

सर्वकाही कांदा पिकासाठी

लासलगाव ही कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठ आणि कांद्याचे वाढते दर यामुळे शेतकरी कांद्याशिवाय दुसरे पीक घेत नाहीत. यंदा समाधानकारक पावसामुळे पाणी टिकून राहिल असा आशावाद होता पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच असून आता पासूनच विकतच्या पाण्यावर पीक जोपासावे लागत आहे. त्यामुळे पीक पदरी पडण्यापूर्वीच अधिकचा खर्च या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.