AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : सर्वोच्च न्यायालयातून पीक विम्याचा प्रश्न मार्गी, मग घोडे अडले कुठे ?

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मध्यंतरी रखडलेल्या पीक विम्याच्या रकमेबाबत निर्णय दिला होता. 6 आठवड्यात शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करावे. विमा कंपनीने रक्कम न जमा केल्यास राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन ही रक्कम अदा करावी. मात्र, दरम्यानच्या काळात बजाज विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Osmanabad : सर्वोच्च न्यायालयातून पीक विम्याचा प्रश्न मार्गी, मग घोडे अडले कुठे ?
पीक विमा योजना
| Updated on: Jun 17, 2022 | 3:15 PM
Share

उस्मानाबाद : जिल्ह्यात 2020 च्या (Kharif Crop) खरीप विमा रकमेचा प्रश्न रखडलेला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने 6 आठवड्यात 200 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने थेट (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत 6 आठवड्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे नेमके पैसे (State Government) राज्यसरकारने द्यायचे की विमा कंपनीने याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पातळीवर याचे राजकारण होत असले तरी शेतकरी गेल्या 2 वर्षापासून हक्काच्या पीक विमा रकमेपासून दूर राहिलेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर का होईना 6 आठवड्यामध्ये हा प्रश्न निकाली लागेल अशी अपेक्षा आहे.

काय आहे नेमकी अडचण ?

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मध्यंतरी रखडलेल्या पीक विम्याच्या रकमेबाबत निर्णय दिला होता. 6 आठवड्यात शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा करावे. विमा कंपनीने रक्कम न जमा केल्यास राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन ही रक्कम अदा करावी. मात्र, दरम्यानच्या काळात बजाज विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवाय 6 आठवड्यात पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर विम्याचे पैसे विमा कंपनीने द्यायचे का राज्य सरकारने यावरुन राजकीय मतभेद सुरु झाले आहे.

लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्योरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे नुकसानीचे पैसे विमा कंपनीने अदा करायचे की राज्य सरकारने. पीक विम्याच्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सरर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम विमा कंपनीनेच अदा करणे अपेक्षित आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपाकडून अशी खेळी केली जात आहे. तर दुसरीकडे 6 आठवड्याची मुदत संपूनही राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आता तरी ठाकरे सरकारने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. विमा कंपनी किंवा राज्य सरकार यापैकी एकाला शेतकऱ्यांचे पैसे देणे हे बंधनकारक असल्याचे भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

सन 2020 साली खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारच्या माध्यमातून पंचनामेही झाले मात्र, असे असताना शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना घेऊन आ. राणा पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही निकाल दिला असला तरी अजून हा प्रश्न निकाली निघालेला नाही. आता आगामी 6 आठवड्यात काय होणार हे पहावे लागणार आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.