Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार

PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.

PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:27 PM

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार (PM-KISAN Scheme Complaint Number) दाखल करता येते.

वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे. 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. रक्कम जमा झाली नसल्यास तक्रार दाखल करता येते.

खात्यात रक्कम आली की नाही असे तपासा

हे सुद्धा वाचा
  1. पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
  2. त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा.
  3. त्याठिकाणी ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
  4. Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
  5. लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
  6. ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.

अशी करा तक्रार

  1. 13 वा हप्ता जमा झाला नाही तर त्याविषयीची तक्रार करता येते.
  2. सर्वात अगोदर कृषी अधिकारी, लेखापाल यांच्याकडे चौकशी करा.
  3. खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगा.
  4. त्यांच्याकडे तक्रार करुनही समाधान न झाल्यास पीएम-किसान हेल्प डेस्ककडे तक्रार करा.
  5. pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तक्रार पाठविता येईल.
  6. पीएम-किसान हेल्प डेस्कच्या 011-23381092 (Direct HelpLine) वर फोन करा.

कृषी मंत्रालयाचे हेल्पलाईन क्रमांक

  1. पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  2. पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक :155261
  3. पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011—23381092, 23382401
  4. पीएम किसान नवीन हेल्पलाइन : 011-24300606
  5. पीएम किसान अजून एक हेल्पलाइन क्रमांक : 0120-6025109

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे.
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण...
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण....
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट.
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं
दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं.
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर.
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड.
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?.
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?.