Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:49 PM

लातूर : गेल्या काही दिवासांपासून (Agricultural Good) शेतीमालाच्या दरात कमालीची घट पाहवयास मिळाली आहे. आवक मोठ्या प्रमाणात असताना (Central Government) केंद्र सरकारची धोरणे आणि अचानक बंद झालेली हरभरा खरेदी केंद्रे याचा परिणाम सोयाबीन आणि हरभरा पिकांवर झालेला आहे. दुसरीकडे केळीच्या दरात सुधारणा होत असताना वादळी वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. मराठवाड्यासह विदर्भात पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून आता केळीची मागणी होते की नाही अशी स्थिती आहे. एकंदरीत बदलत्या वातावरणाचा परिणाम उत्पादनावर आणि बाजारपेठेतील शेतीमालाच्या दरावरही झाला आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम ?

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी सोयाबीनही आहे. मात्र, वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती पाऊस बरोबर वादळी वारेही घेऊन आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते केळी उत्पादकांचे. आता केळी तोडणीला आली आहे. शिवाय 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दरही आहे. हंगामातील विक्रमी दर असताना दुसरीकडे तोडणीला आलेल्या केळी बागा ह्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांचा तोंडचा घास हिसकावला जात आहे. नाशिकसह मराठवाड्यातील शेतकरी तोडणीला आलेली केळी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

इतर शेतीमालाच्या दराचे काय ?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातून शेतीमालाची आवक होते. विशेष करुन येथील प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन विशेष महत्व आहे.सध्या तुरीला 6 हजार 240, हरभरा 4 हजार 700, सोयाबीन 6 हजार 900, मूग 5 हजार 600 रु क्विंटल, उडीद 6 हजार 250 असे दर आहेत. शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना आता सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दिलासा मिळत आहे.

केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.