Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif : बीबीएफ पेरणी यंत्राचा फायदा काय? खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अधिकतर शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत.तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात. सरी काढताना फाळ एक फूट रुंद ठेवावेत. जेणेकरून एक ते सव्वा फुटाची सरी निघेल. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.

Kharif : बीबीएफ पेरणी यंत्राचा फायदा काय? खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:49 AM

लातूर : हंगाम रब्बी असो की (Kharif Season) खरीप उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी (BBF Technology) बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर वाढवण्यासाठी (Agricultural Department) कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतो. शिवाय यामध्ये शेतकऱ्यांबरोबरच यंत्र चालकाचीही भूमिका महत्वाची असल्याने काही गावांमध्ये तर शिबिरेही घेतली जातात. पण नेमकी ही पेरणी यंत्र पध्दत आणि तिचे फायदे काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांना झाली तर त्याचा वापरही वाढणार आहे. शिवाय निती आयोग व कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांना हे यंत्र दिले जाते. त्यामुळे बीबीएफचा नेमका फायदा काय याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.

बीबीएफ यंत्राद्वारे अशी होते पेरणी

*ट्रॅक्‍टरचलित चार फणी यंत्राच्या सांगाड्यावर दोन सरी नांगर बसवलेले आहेत. यंत्राच्या सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाणासाठी दोन मुख्य भाग आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी चार उपभाग केले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे व खतपेटी आहे. त्यामुळे आंतरपिकाची पेरणी करता येते.

*बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट तर खत पेरणीसाठी उभी प्लेट बसविलेली आहे. यंत्रासोबत विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. यंत्रामध्ये आवश्‍यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करता येते.

हे सुद्धा वाचा

*टोकण यंत्राने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, ज्वारी, मूग, उडीद, कपाशी, बाजरी, कांदा इत्यादी पिकांची पेरणी करता येते.

उपलब्ध अवजाराने रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी

अधिकतर शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत.तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात. सरी काढताना फाळ एक फूट रुंद ठेवावेत. जेणेकरून एक ते सव्वा फुटाची सरी निघेल. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.

रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचे फायदे

यंत्राच्या साहाय्याने हव्या त्या रुंदीचे वरंबे आणि सऱ्या तयार करता येतात. रुंद वरंबे तयार करत असताना त्यावर बियाण्यांची टोकण करता येते. आंतर पीक पद्धतीनुसार दोन पिके एकाच वेळी घेता येतात. दोन फणांतील तसेच दोन रोपातील अंतर पिकानुसार बदलता येते. ठरावीक अंतरावर आणि खोलीवर बियाणांची टोकण होत असल्याने बियाणे बचत व उगवण चांगली होते. विरळणीची आवश्‍यकता नाही.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.