Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते.

Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?
वातावरणातील बदलामुळे कोकणातील जांभळाच्या उत्पदनात घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:35 PM

डहाणू : निसर्गाचा लहरीपणा केवळ (Mango Production) आंबा उत्पादनापर्यंतच मर्यादित राहिला नाही तर त्याची झळ (Jamun Production) जांभळापर्यंत येऊन ठेपली आहे. अवकाळीमुळे सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले होते तर कडाक्याच्या उन्हाचा परिणाम यंदा बहाडोलीच्या टपोरी जांभळावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यच्या तोंडावर ही जांभळ बाजारपेठेत दाखल होत असतात पण यंदा (Climate Change) हवामानातील बदलामुळे कोकणाती तब्बल 90 टक्के उत्पादन घटले आहे. केवळ उत्पादनच घटले असे नाहीतर डहाणू भागातील तीन गावच्या ग्रामस्थांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारण येथे पिकणाऱ्या बहाडोलीच्या जांभळाला हजार रुपये किलो असा दर मिळतो. पण यंदा मागणी असतानाही घटलेल्या उत्पादनामुळे बाजारपेठेत ही जांभळ दाखलच झाली नाहीत.

बहाडोलीच्या जांभळाला देशभर मागणी

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते. शिवाय हंगामाच्या सुरवातीला प्रतिकिलो 8 ते 10 हजार रुपये किलो असा विक्रमी दर मिळतो. यंदा मात्र, 90 टक्के उत्पादन घटल्याने अजून मुंबई मार्केटमध्येच मागणीच्या तुलनेत आवक झालेली नाही.

तीन गावांवर उपासमारीची वेळ

कोकणातील बहाडोली, धुकटन आणि खामलोली या गावच्या शिवारात केवळ जांभळाच्या उत्पादनावर भर दिला जातो. या भागातील 400 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा 4 हजार जांभळावरच असतो. प्रत्येक झाडामधून 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न हे ठरलेले असते. यंदा मात्र, अवकाळी पावसाने उत्पादन प्रक्रियेच अडथळा निर्माण झाला तर जांभूळ पोसण्याच्या दरम्यान कडाक्याच्या उन्हामुळे जांभळ अक्षरश: करपली गेली. त्यामुळे 3 ते 4 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. केवळ 10 उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

हे सुद्धा वाचा

ना भरपाई ना महोत्सव

जांभळाचे झाड जोपासण्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो तर यंदा उत्पादनच न मिळाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. शिवाय या शेतकऱ्यांना पीक विम्याचाही लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण वैभवात भर टाकणारा जांभूळ महोत्सवही यंदा रद्द झाला आहे. जांभळाचा मोहरच करपल्याने महोत्सावासाठीही जांभळे मिळणे अशक्य झाले आहे. जांभळाच्या संवर्धनाकडे कृषी विभागानेही दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.