Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम

सोयाबीनचे घटलेले उत्पादन, वाढलेली मागणी आणि यातच आता रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये व्यवहार झाले नसले तरी प्रक्रिया उद्योगावरुन सोयाबीनचे दर हे चढेच राहणार असल्याचे चित्र आहे.

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम
सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असल्याने दरात सुधारणा राहणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:58 PM

लातूर : सोयाबीनचे घटलेले उत्पादन, वाढलेली मागणी आणि यातच आता रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये (Soybean Rate) सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये व्यवहार झाले नसले तरी (process industry) प्रक्रिया उद्योगावरुन सोयाबीनचे दर हे चढेच राहणार असल्याचे चित्र आहे. कारण लातूर येथील प्रक्रिया उद्योजकांनी मंगळवारी सोयाबीनची खरेदी हे तब्बल 7 हजार 700 रुपये क्विंटलप्रमाणे केली आहे. तर दुसरीकडे अर्जेंटिना रशिया आणि युक्रेन येथून सुर्यफुलाचे (edible oil import) तेल आयात ठप्प झाली आहे. परिणामी तेलासाठी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची मागणी वाढली आहे. याचाच परिणाम दरावरही होताना दिसत आहे.सध्या सोयाबीनला हंगामातील उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होणार की घटणार यामुळे विक्रीबाबत शेतकरी हे संभ्रम अवस्थेत आहेत.

उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना तारले

खरीप हंगामातील सोयाबीन जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन हेच मुख्य पीक असल्याने झालेले नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच हंगामाच्या सुरवातीला दरही कवडीमोल मिळाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री नाही ही भूमिका घेतल्यानेच आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेली दराची घोडदौड अजूनही कायम आहे.

आता पर्याय सोयाबीनचाच

नाही म्हणलं तरी सोयाबीनच्या दरावर युध्दजन्य परस्थितीचा परिणाम हा होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनसह अर्जेंटिना येथून सुर्यफूलसह इतर तेलाची भारतामध्ये आयात केली जाते. हा आयात आता ठप्प आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांना आता सोयाबीन शिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असताना या गोष्टी घडून आल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दर, निर्णय शेतकऱ्यांचा

हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दर हे वाढलेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे दर हे दुप्पट झाले आहेत. मात्र, सध्या अस्थिर दरामुळे आणि य़ुध्दजन्य परस्थितीचा अणखी किती परिणाम होणार यामुळे साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न कायम आहे. पण 7 हजार 500 हा दर चांगला असून अधिकचे नुकसान न होऊ देता या दरात शेतकऱ्यांनी विक्रीलाच प्राधान्य देण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत.

संबंधित बातम्या :

Mango : जीआय मानांकन हापूसला हक्काचे मार्केट, खरेदी केंद्राची उभारणी अन् विक्रीही

PM Kisan Yojna : आता बॅंक खाते क्रमांकाची सक्ती नाही, मग काय आहे नवीन पर्याय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

Latur : शेतकऱ्यांचा हाबाडा अन् पीकविम्याबाबत आश्वासन नव्हे थेट तोडगाच, लातुरात नेमके झाले काय?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.