Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘ही’ कंपनी 2 वर्षांचा पगार देणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

काही खासगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत. Bajaj Auto employees Corona

कोरोनामुळं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी 2 वर्षांचा पगार देणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 3:19 PM

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून कोरोनाशी लढत आहेत. काही खासगी कंपन्यादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत. भारतातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. बजाज ऑटोच्या एखाद्या कायम असणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू ससंर्गामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंतचा पगार देण्यात येईल. मुलांच्या शिक्षणावर देखील खर्च केला जाईल, असं बजाजनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंकडेनवर सांगितलं आहे. (Bajaj Auto declared company will pay salary to family for 2 years and educate children of employees who die of Corona)

बजाजनं त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?

बजाज ऑटोनं लिंकडेन वर पोस्ट केली आहे. त्यावर त्यांनी कोरोना काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पगाराची रक्कम जी दरमहा 2 लाखापर्यंत असेल ती त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. याशिवाय त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुबीयांच्या नातेवाईकांचा 5 वर्षांचा वैद्यकीय विमा देखील काढण्यात येईल. याशिवाय दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलणार असल्याचं बजाजनं म्हटलं आहे. बजाज ऑटो कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खर्चासाठी 12 पर्यंतच्या शिक्षणासाठी 1 लाखऱ रुपये दरवर्षी देईल. पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी 5 लाखांचा खर्च बजाज ऑटो करेल, असं सांगण्यात आलं आहे.

संकटकाळात कर्मचाऱ्यांसोबत राहणार

आम्ही कर्मचारी केंद्रीत अशी संस्था असून कोरोना विषाणून संसर्गाच्या काळात आम्ह आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेत आहोत. कोरोनापासून सुरक्षा होण्यासाठीच्या सुविधा, टेस्टिंग आणि रुग्णालय सुविधा, कोरोना लसीकरण शिबीर अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहोत, असं बजाजनं म्हटलं आहे.

बोरोसिल कंपनी देखील 2 वर्ष पगार देणार

बजाज ऑटोपूर्वी बोरोसिल अँड बोरोसिल रिन्यूवेबल्सनं त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील करु असं जाहीर केलं होतं.

मुथूट फायनान्स

मुथूट फायनान्स या कंपनीनं त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दोन वर्षापर्यंतचा पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. हा लाभ ज्या कर्मचाऱ्यांनी मुथूट फायनान्समध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं असेल त्यांच्यासाठी देण्यात येईल.

संबंधित बातम्या:

Elon Musk: एलन मस्कचं एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, टेस्लाच्या प्रमुखानं काय म्हटलं?

पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीवरील व्याज दर बदलले, फटाफट वाचा नवे दर

(Bajaj Auto declared company will pay salary to family for 2 years and educate children of employees who die of Corona)

कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.