AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा

AI Hub : जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने भारतातील दोन मोठ्या उद्योग समूहासोबत हातमिळवणी केल्याचे जाहीर केले. यामध्ये टाटा समूह आणि रिलायन्स समूहाचा समावेश आहे. भारतात कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान(AI) हब तयार करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

AI Hub : भारत होणार AI हब! रिलायन्सनंतर टाटा समूहासोबत या कंपनीचा वायदा
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : जगात सध्या कृत्रिम बुद्धिमतेचा (AI Technology) बोलबाला सुरु आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहेत तर या तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत झटपट काम उरकेल. मनुष्यबळ कमी लागेल असे काही दावे करण्यात येत आहे. भारत लवकरच एआय हब होण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आणि टाटा समूहासोबत (Tata Group) त्यांनी सहकार्य कराराची घोषणा केली. शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी याविषयीची माहिती देण्यात आली. या नव्या घडामोडींमुळे देशातील उदयोन्मुख पिढीला मोठा फायदा होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. तर काहींना हे तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात मनुष्याचे काम हिसकावून घेईल अशी भीती वाटत आहे.

NVIDIA आणणार क्रांती

NVIDIA Inks ही कंपनी भारतात या आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी करणार आहे. त्यासाठी रिलायन्स समूह आणि टाटा समूहाशी हातमिळवणी करण्यात आली आहे. बाजारात चीनला शह देण्यासाठी भारताला विकासाच्या वाटेने जाणे क्रमप्राप्त आहे. चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भरीव प्रयत्न करण्यात येत आहे. आता एआय तंत्रज्ञानासाठी जमीन कसण्यात येत आहे. रिलायन्स कंपनी त्यांच्या फाऊंडेशन लार्ज लँग्वेज मॉडलसाठी(LLM) काम करत आहे. देशातील विविध भाषांमध्ये सहज संवाद साधता यावा, सहज आणि योग्य भाषांतर व्हावे यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी AI टूल्स आणण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. NVIDIA Inks त्यासाठी खास मदत करणार आहे. (Latest News Marathi)

हे सुद्धा वाचा

सुपर कम्प्युटरला टाकेल मागे

दोन्ही कंपन्या एआय पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर देणार आहे. त्यामाध्यमातून रिलायन्स आणि Nvidia Inks भारतातील सुपर कम्युटरला पण मागे टाकेल. त्यापेक्षा अधिक वेगाने हे तंत्रज्ञान काम करेल. सध्या रिलायन्स AI इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

कंपनीकडे 3800 कर्मचारी

NVIDIA Inks ने 2004 साली भारतात व्यवसाय थाटला. या कंपनीकडे अनेक क्लाएंट आहेत. या कंपनीचे देशात 4 इंजिनिअरिंग सेंटर आहेत. यामध्ये गुरुग्राम, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे. या सेंटरमध्ये सध्या 3800 कर्मचारी काम करत आहेत. भीती नको

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence-AI) सध्या जोरदार चर्चेत आहे. हॉलिवूडमधील लेखक आणि कलाकार त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तर अनेकांना नोकऱ्या जाण्याचा धोका सतावत आहे. काहीं सरकारांना माहितीचा गैरवापर वाढण्याची भीती सतावत आहे. संगणक, कम्प्युटर आले तेव्हा पण अशीच धास्ती होती. भीती होती, पण त्याचा मोठा तोटा झाला नाही. तसाच एआयचा पण बाऊ करण्याची गरज नसल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.