Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electricity | अंधारात साजरी करावी लागेल का देशवासियांना दिवाळी? कोळशाच्या कमतरतेमुळे सणांच्या आनंदावर पडणार का विरजण?

Electricity | आगामी दोन महिने देशात सणासुदीचे आहेत. दसऱ्यानंतर दिवाळी हा मोठा सण येणार आहे. अशातच देशात कोळशाची कमतरता आहे. सणांच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने काय उपाय योजना केली ते पाहुयात..

Electricity | अंधारात साजरी करावी लागेल का देशवासियांना दिवाळी? कोळशाच्या कमतरतेमुळे सणांच्या आनंदावर पडणार का विरजण?
सणासुदीत वीजेचा तुटवडा नाहीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 1:34 PM

नवी दिल्ली : आगामी दोन महिने देशात सणासुदीचे (Festival Seasons) आहेत. दसऱ्यानंतर दिवाळी (Diwali) हा मोठा सण येणार आहे. अशातच देशात कोळशाची (Coal Crisis) कमतरता आहे. सणांच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने काय उपाय योजना केली ते पाहुयात..

देशातील वीज निर्मिती केंद्रावर कोळशाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कोळशाची वेळेत पुर्तता न झाल्याने विद्युत निर्मिती केंद्र बंद पडले होते.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे तणाव वाढला होता. कोळशाच्या पुरवठा वेळेत न झाल्याने राजस्थान, दिल्लीसहित मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये अनेक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

हे सुद्धा वाचा

या परिस्थितीपासून धडा घेत, केंद्र सरकारने कोळसा संकटावर मात करण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केला होता. ऐन सणासुदीत पुन्हा कोळशाचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्राने अगोदरच कंबर कसली होती.

आता सणासुदीत बित्तगूल होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 2 कोटी टन कोळश्याची आयात (Coal Import) केली आहे. बाहेरील देशातून हा कोळसा आणण्यात आला आहे.

विद्युत आणि ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी याविषयीची माहिती दिली. कोळशाचा तुटवडा पाहता सरकारने अगोदरच कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला होता.

‘इनसाइट 2022’ या कार्यक्रमात त्यांनी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती दिली. वेळीच कोळशाची आयात करण्याचा निर्णय फायदेशीर ठरला

सध्या देशात दोन कोटी टन कोळशाची आयात करण्यात आली आहे. त्यातील 1.5 कोटी टन कोळशाचा वापर करण्यात आला आहे. तर उर्वरीत स्टॉक हा सणासुदीत वाढलेल्या वीज मागणीची पूर्ततेसाठी वापरण्यात येईल.

गरज पडली तर सरकार आणखी कोळसा आयात करणार असल्याचे सचिव आलोक कुमार यांनी सांगितले. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असून त्यांना मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.