Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G spectrum auction | आता देशात 5G चं वारं! आजपासून स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया, 15 ऑगस्टला डिजिटल वेगवान क्रांती पर्व

India 5G spectrum auction | भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनी देशात 5G सेवा दणक्यात सुरु होत आहे. आजपासून 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया सुरु होत आहे. झी बिझनेसने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.

5G spectrum auction | आता देशात 5G चं वारं! आजपासून स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया, 15 ऑगस्टला डिजिटल वेगवान क्रांती पर्व
5G ची देशात नांदीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:48 AM

India 5G spectrum auction | आता लवकरच भारतात 5G चं वेगवान वारं वाहणार आहे. 76 वर्षांच्या स्वातंत्र्याला साक्षी ठेऊन येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी पासून देशात 5G चं क्रांती पर्व अवतरेल. तुमचा मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट टिव्ही वरील इंटरनेट (Internet) धुमशान धावेल. मोबाईल्सवर पीडीएफ फाईल्स काही सेंकदात, अख्खा पिक्चर काही सेंकदात येऊन पडेल. कारण आजपासून आजपासून 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया (auction Process) सुरु होत आहे. मंगळवारपासून देशाच्या विविध भागांमध्ये 5G सेवेची चाचणी सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत 4 कंपन्या (Companies) सहभागी होणार आहेत. यामध्ये रिलायन्स, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा (Data Network) समावेश आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. 5G स्पेक्ट्रम (5G spectrum ) च्या लिलावात, कंपन्यांनी 21800 कोटी रुपयांचे अर्नेस्ट मनी जमा केले आहेत. या दरम्यान केवळ 72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे.

15 ऑगस्टचा मुहुर्त

या 15 ऑगस्ट रोजी 5G सेवा कोणत्याही एका टप्प्यावर सुरू केली जाऊ शकते. झी बिझनेसने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. 5G स्पेक्ट्रमच्या या लिलावातून सरकारला 80 ते 90 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत 5G सेवा देशभर सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

14 ठिकाणी चाचणी सुरू आहे

या पंधरवाड्यात देशातील 14 ठिकाणी 5G सेवेची चाचणी सुरू करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 5G सेवा 15 ऑगस्टला कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. देशातील 4 प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी या लिलावात भाग घेतला असून त्यांनी अमानत रक्कमही जमा केली आहे.

कोणी किती EMD केले जमा

रिलायन्स जिओ – 14000 कोटी भारती एअरटेल – 5500 कोटी व्होडाफोन आयडिया – 2200 कोटी अदानी डेटा नेटवर्क्स – 100 कोटी

या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये लिलाव

ही लिलाव प्रक्रिया 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 3300 MHz (मध्यम), 26 GHz (उच्च) फ्रिक्वेन्सी बँडमध्ये होणार आहे. याशिवाय कंपन्यांना स्पेक्ट्रमच्या किंमती 20 समान EMI मध्ये देण्याची सुविधा दिली जाईल. त्याचबरोबर खासगी कॅप्टिव्ह नेटवर्क उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

बोली लावणाऱ्यांमध्ये भारतातील तीनही प्रमुख मोबाइल ऑपरेटर्सचा समावेश आहे. त्यात रिलायन्स जिओ, मार्केट लीडर, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया. चौथा स्पर्धक भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांनी अचानक या लिलाव प्रक्रियेत उडी घेतली.

5G स्पेक्ट्रमचे एकूण 72 गिगाहर्ट्ज ब्लॉकवर असतील. लिलाव प्रक्रियेत विजेत्याला 20 वर्षांसाठी हक्क राखून ठेवतील.

एकूण, चार बोलीदारांनी $2.7 अब्ज (218 अब्ज भारतीय रुपये) अनामत रकमेमध्ये ठेवले आहेत, ही कराराची पुष्टी करण्यासाठी आवश्यक असलेली अनिवार्य रक्कम आहे. जमा केलेली अनामत रक्कमेतून कंपनी या प्रक्रियेतून किती स्पेक्ट्रम खरेदी करू इच्छिते याचे संकेत मिळातात.

नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.