India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार

| Updated on: Sep 21, 2023 | 3:21 PM

India-Canda : शेजारी नसलेल्या कॅनडाशी भारताचे संबंध आता टोकाचे ताणल्या गेले आहेत. या वादाचा परिणाम थेट भारतीयांच्या किचन बजेटवर पडणार आहे. कॅनडाचे जसे नुकसान होईल, तसे भारताचे पण नुकसान होईल, असा बसू शकतो फटका..

India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार
Follow us on

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारत कॅनडामधील वाद (India Canda Crisis) शमण्याची चिन्हे दिसत नाही. कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरमाईचे सूर आळवले असले तरी वाद संपलेला नाही. खलिस्तानवाद्यांसाठी आश्रू गाळणाऱ्या पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांच्याविरोधात भारतात संतापाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी राजदूत परत पाठवले आहेत. नवीन व्यापारी धोरणे थंडबस्त्यात पडली आहे. दोन्ही देशांमधील वादाने टोक गाठले आहे. भारत आणि कॅनडामध्ये यावर्षी 2023 मध्ये जवळपास 8 अब्ज डॉलर म्हणजे 67 हजार कोटींचा व्यापार झाला आहे. जर परिस्थिती आणखी चिघळली तर 67 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचा परिणाम थेट किचन बजेटवर होणार आहे.

असा दिसेल परिणाम

सर्वसामान्य भारतीयांच्या आहारात डाळींना खूप महत्व आहे. भारत-कॅनडामध्ये तणाव वाढल्याने डाळीच्या आयातीवर त्याचा परिणाम होईल. भारत कॅनडातून मसूर डाळ सर्वाधिक आयात करतो. राजकीय संबंध ताणल्याचे परिणाम व्यापारी संबंधावर दिसून येतील. डाळीच आयात रोडावू शकते. देशात सर्वसामान्य महागाईने मेटाकूटीला आला असताना हे नवीन संकट त्याला फटका देईल.

हे सुद्धा वाचा

असे बिघडेल किचन बजेट

भारत कॅनाडातून मोठ्या प्रमाणात मसूर डाळ आयात करतो. 2022-23 या कालावधीत देशात एकूण 8.58 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली होती. या जून तिमाहीत आतापर्यत जवळपास 3 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली आहे. जर वाद लवकर मिटला नाही तर आयात थांबेल, मसूर डाळ पण महागेल. पचणास हलकी म्हणून या डाळीचा मोठा वापर होतो.


मसूर डाळीचे वाढू शकतात भाव

भारत-कॅनडा वाद लांबला तर डाळीच्या आयातीवर निर्बंध येऊ शकतात. डाळीचा पुरवठा रोडावू शकतो. मसूर डाळीची आवक सर्वाधिक प्रभावित होईल. देशात पुरवठा कमी झाल्यास अथवा काळाबाजार झाल्यास डाळीच्या किंमती भडकू शकतात. केंद्र सरकारने डाळीच्या महागाईवर तोडगा काढला आहे. डाळीची आयात वाढविण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. पण या नवीन वादाने डोके वर काढल्याने मसूरसह इतर डाळीच्या आयतीवर परिणाम दिसू शकतो.