Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Import : भारतीयांनी सोन्यालाच केले ‘आडवे’! आयात प्रचंड घसरली, महागाईचा असाही परिणाम

Gold Import : लग्नसराईमध्ये सोने खरेदीची मोठी धावपळ उडते. या काळात सराफा बाजार फुललेला असतो. बाजारात प्रचंड वर्दळ असते. पण सोन्याच्या किंमती भडकल्यापासून सोने आयात प्रचंड घसरली आहे. त्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

Gold Import : भारतीयांनी सोन्यालाच केले 'आडवे'! आयात प्रचंड घसरली, महागाईचा असाही परिणाम
आयात घटली
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोन्याने गिअर बदलला. सोने सूसाट धावत आहे. 50 हजारांच्या आत बाहेर खेळणाऱ्या सोन्याने अवघ्या चार महिन्यात 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराचा रस्ता चुकवला आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतीचा (Gold Price) परिणाम लागलीच दिसून आली. सराफा बाजारात सोने-चांदीची मागणी कमी झाली. आकडेवारीने तर अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा आयात (Gold Import) प्रचंड घसरली आहे. ग्राहकांनी महागड्या सोन्याला दुरुनच नमस्कार घातला आहे. त्यामुळे सोन्याच्या आयातीला प्रचंड फटका बसला आहे. घरगुती बाजारात किंमती वाढल्याने आणि मागणी घसरल्याने सोन्याची आयात घसरली. जानेवारी, 2023 मध्ये सोन्याची आयात 76 टक्के घसरली आहे. गेल्या 32 महिन्यातील हा नीच्चांकी आकडा आहे. आकड्यानुसार, आयात घसरली असली तरी ही पथ्यावर पडली आहे. त्यामुळे व्यापारी घाटा कमी झाला आहे.

सरकारी सूत्रांनुसार गुरुवारी याविषयीची माहिती समोर आली. त्यात जानेवारी महिन्यात केवळ 11 टन सोन्याची आयात करण्यात आली आहे. तर गेल्यावर्षी जानेवारी, 2022 मध्ये देशात 45 टन सोन्याची आयात करण्यात आली होती. गेल्यावर्षी देशात 69.7 कोटी डॉलर सोने आयात करण्यात आले होते. यंदा आकड्यांनी खरी परिस्थिती विषद केली आहे. यंदा केवळ 2.38 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे.

स्थानिक बाजारात सोने जास्तच चमकले. सोन्याने प्रति 10 ग्रॅम 58 हजारांच्या पुढे पोहचले. हे दर 60,000 रुपये ते 62,000 रुपयांच्या घरात पोहचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचा खरेदीदारांच्या मनोभूमिकेवर मोठा परिणाम झाला. सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. ठराविक आणि श्रीमंतच सोन्यात गुंतवणूक वाढवत आहे. सर्वसामान्यांनी आणि गरिबांनी सोन्याची गल्ली बदलवली आहे.

हे सुद्धा वाचा

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याची आयात घसरल्याने सराफा बाजारात चिंतेचे वातावरण आहे. तरीही सराफा व्यापाऱ्यांना लग्नसराईत सोन्याची मागणी आणखी वाढेल अशी आशा आहे. येत्या तीन महिन्यात सोन्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पात होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. उलट केंद्र सरकारने चांदीवरील आयात शुल्क वाढले आहे.

सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जानेवारीने निराशा केली असली तरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोन्याच्या आयातीत मोठी मागणी नोंदवली जाऊ शकते. आयात शुल्काकडे दुर्लक्ष करत सोन्याची आयात वाढवू शकतात. त्यामुळे येत्या काही महिन्यात सोन्यावरील मळभ कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.