Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा धमाका; 45 हजार कोटींचा परतावा चारच दिवसांत

शेअर बाजाराने अखेरच्या सत्रात तडाखेबंद खेळी खेळल्याने रिलायन्सला मोठा फायदा झाला. रिलायन्सचा शेअर उसळला. या घौडदौडीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप 20.13 लाख कोटी रुपयांवर पोहचले. मुकेश अंबानी यांच्या कंपनीशिवाय LIC आणि ICICI Bank ने पण गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.

मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा धमाका; 45 हजार कोटींचा परतावा चारच दिवसांत
रिलायन्समुळे छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 5:42 PM

शेअर बाजारात चढउताराच सत्र कायम असते. पण बाजारातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांचे नशीब पालटून टाकले. आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने लांब टप्पा गाठला. या घौडदौडीमुळे रिलायन्सचे मार्केट कॅप 20.13 लाख कोटींच्या घरात पोहचले. गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करता आली. या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना अवघ्या 4 दिवसांत 45,000 हजार कोटी रुपयांहून अधिकची कमाई करता आली.

रिलायन्सने केली कमाल

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. मुंबई स्टॉक् एक्सचेंज, बीएसईमधील सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजारातील भांडवल वाढले. तीन कंपन्यांचे बाजारातील मूल्य घसरले. फायद्यातील सात कंपन्यांचे मार्केट कॅप एकूण 67,259.99 कोटी रुपये होते. यामध्ये रिलायन्सने गुंतवणूकदारांना सर्वाधिक कमाई करुन दिली. बीएसई सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात 819.14 अंकांची भरारी घेतली होती.

हे सुद्धा वाचा

RIL चे बाजारातील भांडवलात वाढ

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने मोठी मजल मारली. या कंपनीचे बाजारातील भांडवल वाढून ते 20.13 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर पोहचले. म्हणजे केवळ चारच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांचा 45,262.59 कोटी रुपयांचा फायदा झाला. रिलायन्स शेअर अखेरच्या सत्रात 2970.30 रुपयांवर बंद झाला होता.

LIC सह ICICI Bank मुळे छपाई

एसबीआय, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला. एसबीआयचे बाजारातील भांडवल 5,533.26 कोटी रुपयांहून 6,71,666.29 कोटी रुपये झाले. तर एलआयसीचे बाजारातील भांडवल 5,218.12 कोटी रुपयांनी वाढले. आता मार्केट कॅप 5,78,484.29 कोटी रुपये इतके झाले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 4,132.67 कोटी रुपयांनी वाढून 7,69,542.65 कोटी रुपयांवर पोहचले.

या खेळाडूंचा तिप्पट परतावा

कल्याण ज्वेलर्स इंडियाने 290 टक्के, कोचिन शिपयार्डने 280 टक्के, रेल्वे विकास निगमने 280 टक्के, SJVN स्टॉक्सने 270 टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने 255 टक्के, झोमॅटोने 255 टक्के, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने 250 टक्के रिटर्न दिला आहे. याशिवाल सोभा, NBCC, स्वान एनर्जी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, अपार इंडस्ट्रीज आणि एनएलसी इंडियाचे शेअर 200-240 टक्के चढले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.