Hasmukh Parekh : चाळीत गेले बालपण, देशाला दिली सर्वात श्रीमंत बँक, हसमुख भाईंची कहाणी काय

Hasmukh Parekh : उतारवयात अनेकांना आराम करण्याचे वेध लागतात. पण याच काळात हसमुख भाई यांनी जगातील सर्वात श्रीमंत बँक उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मोठा इतिहास घडवला. कोण आहेत हसमुख भाई, त्यांची वाचा कहाणी

Hasmukh Parekh : चाळीत गेले बालपण, देशाला दिली सर्वात श्रीमंत बँक, हसमुख भाईंची कहाणी काय
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली : एचडीएफसी बँक, एचडीएफसी कंपनी लिमिटेड यांच्या विलिनीकरण झाले. 9 लाख कोटी रुपयांहून अधिकचे भांडवलासह एचडीएफसी बँक सर्वात श्रीमंत बँक(HDFC Bank) ठरली आहे. या बँकेचा प्रवास इतका सोपा नव्हता. ही बँक हसमुखभाई ठाकोरदास पारेख (Hasmukh Bhai Parekh) यांनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या बँकेची स्थापना करणारे हसमुखभाई मुंबईतील एका चाळीत राहत होते. त्यांनी अत्यंत गरिबीत जीवन काढले. जिद्दीने शिक्षण घेतले. हसमुखभाईंची मेहनतीने रंग भरला. एचडीएफसी बँक भारतातील मोठी व्यावसायिक बँक ठरली. हसमुख भाईंचे पुतणे दीपक पारेख यांनी भरीव योगदान दिले. आज या बँकेने भारतातच नाही तर जगात इतिहास रचला आहे.

वडिलांकडून मिळाली शिदोरी कष्ट करण्याची आणि बँकिंग सेवांची माहिती हसमुख भाईंना त्यांचे वडील ठाकोरदास पारेख यांच्याकडून मिळाले. हसमुख पारेख यांनी त्यांचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडन येथे गेले. ब्रिटेनमधून ते भारतात परत आल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एचडीएफसी बँकेचा पाया घातला.

शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब हसमुख ठाकोरदास पारेख यांनी शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब केला. मुंबईत त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांना ब्रिटेनला शिक्षणाची संधी मिळाली. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून त्यांनी बँकिंग आणि फायनान्स याविषयीत बीएससीची पदवी मिळवली. त्यानंतर हसमुख पारेख भारतात परतले. ते मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

हे सुद्धा वाचा

स्टॉक ब्रोकिंग फर्म त्यानंतर त्यांनी स्टॉक ब्रोकिंग फर्म हरकिसनदास लखमीदास या फर्मसोबत कामाला सुरुवात केली. आयसीआयसीआयमध्ये पण त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीपूर्वी ते याठिकाणी उप महाप्रबंधक म्हणून काम केले होते.

निवृत्तीनंतर बँकिंग व्यवसाय 66 व्या वर्षी लोक सेवानिवृत्तीनंतर घरी बसण्याचा अथवा आराम करण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी हसमुखभाई यांनी भारतातील मध्यमवर्गातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याची कल्पना सुचली. त्याकाळी कर्ज मिळणे अवघड होते. तसेच कर्ज घेण्याचा प्रघात नव्हता. अशावेळी मध्यमवर्गाला कर्ज देण्यासाठी त्यांनी 1977 मध्ये एचडीएफसी ही वित्तीय संस्था सुरु केली. 1978 मध्ये त्यांनी पहिले गृहकर्ज दिले.

सर्वात मोठी बँक 1984 पर्यंत एचडीएफसी 100 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक कर्ज वाटप केले होते. 1992 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म भूषण देऊन सन्मान केला होता. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे नुकतेच विलिनीकरण झाले. आता ही 14.14 लाख कोटी रुपयांची बँक झाली आहे.

काका-पुतण्याने उभारली बँक एचडीएफसीचे पूर्व चेअरमन दीपक पारेख, हसमुख पारेख हे काका-पुतणे आहेत. हसमुख पारेख यांनी त्यांचे पुतणे दीपक पारेख यांनी पण एचडीएफसी बँकेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी बोलावले होते. त्यांचा हा निर्णय एकदम योग्य ठरला.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.