Stock Market : येत्या 4 दिवसात सांभाळून गुंतवणूक करा, शेअर बाजारात त्सुनामी येणार? युद्धचं नाही तर कारणांची ही यादी वाचा

Share Market Crash : शुक्रवारी शेअर बाजारात सलग पाच दिवसांत घसरण दिसली. यादरम्यान सेन्सेक्स 4,147.67 अंकांनी घसरला. तर निफ्टीत 1,201.45 अंकांची घट दिसली. गुंतवणूकदारांचे 16.68 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. शुक्रवारी NSE Nifty 235.5 अंकांनी घसरून 25,014.6 अंकावर बंद झाला.

Stock Market : येत्या 4 दिवसात सांभाळून गुंतवणूक करा, शेअर बाजारात त्सुनामी येणार? युद्धचं नाही तर कारणांची ही यादी वाचा
शेअर बाजारात जरा संभाळून
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 10:29 AM

गेल्या 5 व्यापारी सत्रात शेअर बाजार धाराशायी झाला. सेन्सेक्स 4100 अंकांहून अधिकने घसरला. तर निफ्टी 1200 हून अधिक अंकांनी आपटला. गुंतवणूकदारांचे या काळात 16 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. जून 2022 नंतर शेअर बाजारातील हा सर्वात वाईट आठवडा ठरला. इराण-इस्त्रायल युद्धाचे सावट त्यासाठी कारणीभूत असले तरी इतर कारणं पण या घसरणीला पूरक ठरली. सध्या युद्धाचे ढग गडद आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात सुद्धा शेअर बाजारावर भीतीचे दडपण राहिल हे नक्की आहे.

शेअर बाजार यामुळे घेऊ शकतो लोटांगण

इराण-इस्त्रायल युद्ध : इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने पण प्रतिवार करण्याचा इशारा दिला आहे. योग्य वेळ येताच इराणला धडा शिकवणार असल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. इस्त्रायल अमेरिका आणि नाटो देशांच्या मदतीने इराणच्या तेल उत्पादन विहिरींना लक्ष्य करण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेवर थेट हल्ला करत कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. जग तिसऱ्या युद्धाकडे वाटचाल करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर या युद्धाचे परिणाम समोर येतील. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. परदेशी गुंतवणूकदार चीनच्या बाजाराकडे वळतील.

हे सुद्धा वाचा

परदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीचे सत्र : युद्धाचे वारे वाहत असतानाच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. अनेक कंपन्यांमधील गुंतवणूक त्यंनी काढून घेतली आहे. शुक्रवारी परदेशी पाहुण्यांनी भारतीय बाजारात जवळपास 9900 कोटी रुपये काढून घेतले. एका आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी 37 हजार कोटी रुपये काढले आहेत.

RBI पतधोरण समितीची बैठक : सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यात पुन्हा एकदा व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताच फायदा होणार नाही. त्यांचा कर्जाचा हप्ता कायम राहील.

हरियाणा निवडणुकीचा निकाल : पुढील आठवड्यात हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल. जर हरियाणात भाजपची हाराकिरी झाली तर शेअर बाजार घसरणीकडे वळण्याची भीती आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये पण भाजपसमोर कडवे आव्हान असल्याने बाजार प्रतिक्रिया देईल.

शुक्रवारी शेअर बाजारात सलग पाच दिवसांत घसरण दिसली. यादरम्यान सेन्सेक्स 4,147.67 अंकांनी घसरला. तर निफ्टीत 1,201.45 अंकांची घट दिसली. गुंतवणूकदारांचे 16.68 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. शुक्रवारी NSE Nifty 235.5 अंकांनी घसरून 25,014.6 अंकावर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स 808.65 अंकावर घसरून 81,688.45 अंकावर बंद झाला.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.