Pulses Inflation : टोमॅटो नंतर डाळी पण रडवणार, भाव इतके भडकणार

Pulses Inflation : महागाईने पाकिस्ताननंतर भारतावर अधिक्रमण केले आहे. गेल्या दोन महिन्यात सोने-चांदीत दरवाढ न होता, इतर सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाने तर शंभरी पार केली आहे. आता भाजीपालाच नाही तर डाळींनी पण असहकार पुकारला आहे.

Pulses Inflation : टोमॅटो नंतर डाळी पण रडवणार, भाव इतके भडकणार
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 10:13 AM

नवी दिल्ली : महागाईने (Inflation) पाकिस्ताननंतर भारतावर अधिक्रमण केले आहे. गेल्या दोन महिन्यात सोने-चांदीत दरवाढ न होता, इतर सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाने तर शंभरी पार केली आहे. आता भाजीपालाच नाही तर डाळींनी पण असहकार पुकारला आहे. टोमॅटो 160 रुपये किलोच्या पुढे विक्री होईल हा कोणी विचार तरी केला होता का? कांदा, आलू, अद्रक, मिरची आणि ही यादी वाढतच चालली आहे. नवनवीन खेळाडू या यादीत दाखल होत आहे. येथे पक्षांतर बंदी कायदा लागू नाही. आता या यादीत डाळींनी वरचा क्रमांक लागणार आहे. डाळीच्या किंमती (Pulses Price) भडकणार आहेत. महागाईने जनता अगोदरच होरपळली आहे. आता त्यांचं जगणं अवघड होणार आहे.

डाळी महागणार लहरी निसर्गाचा मोठा फटका गेल्या वर्षांपासून मानव जातीला बसत आहे. तापमान वाढीमुळे, वायू उत्सर्जनामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचा परिणाम अवकाळी पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही भागात पावसाने थांबाच न घेतल्याने पीकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. पेरणीत 31 ते 60 टक्के कमतरता आली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह इतर धान्याच्या किंमती दुहेरी शतक मारण्याच्या तयारीत आहेत.

यामुळे बसेल फटका

हे सुद्धा वाचा
  1. उडद आणि तूर डाळीच्या किंमती भडकणार
  2. अनेक राज्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी तडी
  3. पाऊस पडण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा 30 ते 40 टक्क्यांवर
  4. पेरण्या रखडण्याची भीती, दुपार पेरणीचे संकट, तर पेरणी होऊन पीक जळण्याची पण भीती
  5. डाळीच्या किंमती दुहेरी शतकाच्या तयारीत
  6. RBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता. त्यामुळे महागाईच्या आगीत तेल ओतले जाणार

पेरण्या रखडल्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तरीही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात चिखलच चिखल झाल्याने शेतकऱ्यांना कामास अडचणी येत आहे. तर काही ठिकाणी शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या याच कालावधीत गेल्यावर्षीपेक्षा 8.6 टक्के एकरावरच पेरणीचे चित्र आहे. काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे. देशात 101 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. शुक्रवारपर्यंत 35.34 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पीकांसाठी योग्य पावसाची गरज आहे.

तूर चिंतातूर तूरीच्या डाळीने चिंता वाढवली आहे. ही डाळ दररोज वापरात येते. यंदा तूरीच्या पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ 0.6 दशलक्ष हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. तर गेल्यावर्षी 1.5 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

उडीद ही कमी उडीदाची पेरणी यावेळी केवळ 0.48 दशलक्ष हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे प्रमाण 31.43 टक्क्यांनी घसरले आहे. भातशेतीवर पण परिणाम झाला आहे. पंजाब वगळता, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने डाळी आणि तांदळाच्या पेरण्यांवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निसर्गाचा चमत्कार दिसला नाही तर महागाईचा मार बसेल.

किंमतीत इतकी उसळी

  1. सध्या तूर डाळीचा सरासरी भाव प्रति किलो 133 ते 137 रुपयांच्या घरात आहे.
  2. शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
  3. तर तूर डाळीचा भाव 200 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  4. उडीदाची डाळ 110-115 रुपये किलो दरम्यान आहे.
  5. शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
  6. उडदाची डाळ 130-150 रुपयांपर्यंत भाव वाढू शकतात.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.