Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..

Global Citizen | एका ग्लोबल सर्व्हेनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडणार आहेत. पण यामागची कारणे काय आहेत?

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..
का सोडून चालले श्रीमंत देश?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 11:52 AM

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीयांना (Richest Indians) प्यारा हिंदुस्थान सोडण्याची घाई झाली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडण्याचा (Migration) दावा करण्यात येत आहे. Henley Global Citizen यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

आता या यादीत उद्योजकच नाही तर कॉर्पोरेट अधिकारी, नोकरशहा, मोठे अधिकारी यांचा समावेश आहे. पण भारतात आतापर्यंत विविध लाभ घेऊन कष्टाने श्रीमंत झालेला हा वर्ग अचानक देश सोडून जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तुम्ही म्हणाल जातील 50-100 माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे.  तर थांबा.  कारण हा आकडा वाटतो तेवढा लहान नाही. तब्बल 8000 श्रीमंत भारतीय देशाला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर असल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एकीकडे सर्वात वेगाने झेपवणारी अर्थव्यवस्था म्हणून डंका पिटवत असताना आणि कोरोनाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताला हा नव पलायनवाद एक धक्काच ठरू पाहत आहे. इतर देशांपेक्षा सोयी-सुविधाही चांगल्या मिळत असताना देशाबाहेर जाणाऱ्यांचा हा मोठा आकडा धक्कादायक आहे.

पासपोर्टचे कडक नियम आणि उद्योगांना मिळणाऱ्या कमी सवलती, इतर अन्य कारणांमुळे हे पलायन वाढले आहे. एक स्वस्त, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मोठे अलिशान घर असावे अशा इच्छेतूनही देश सोडण्यात येत आहे.

काही श्रीमंत कर रचनेवर प्रचंड नाराज आहे. त्यांना देशात जादा कर द्यावा लागत आहे. कराचा बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नाराजीमुळे ते देश सोडत आहे. कमी प्रदूषण असलेल्या देशात, निसर्गाच्या सान्निध्यात व्यापार उदीम वाढवण्यास वेळ मिळत असल्याने श्रीमंत भारतीय देश सोडण्याचा दावा करण्यात येत आहे.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....