Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wheat Price : खूशखबर! गव्हाचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा जोरदार प्लॅन

Wheat Price : अवकाळी पावसाने अनेक पीकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बाजारात अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण मोदी सरकारने त्यावर जालीम उपाय शोधला आहे.

Wheat Price : खूशखबर! गव्हाचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा जोरदार प्लॅन
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:26 AM

नवी दिल्ली : बेमौसमी पावसाने (Unseasonal Rain) अनेकांच्या आशा-आकांक्षावर पाणी सोडले. उभ्या पिकांना अवकाळी पावसाने झटका दिला. शेतकरीच नाही तर सर्वसामान्य ग्राहकाची बैचेनी वाढली आहे. पिकं हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अन्नधान्याच्या किंमतीत वाढ होण्याच्या भीतीने ग्राहकांचा जीव टांगणीला लागला आहे. यंदा उन्हाळा लवकर सुरु झाला. पण अवकाळी पावसाचा फटका बसला. गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. पण त्यामुळे बाजारातील किंमती भडकणार नाहीत. गेल्यावर्षीच गव्हाच्या किंमती (Wheat Price Hike) गगनाला भिडल्या होत्या. यंदा केंद्र सरकारने (Central Government) वेळीच उपाय योजना केल्या होत्या. नवीन गव्हाच्या जीवावर हे वर्ष निघून जाईल असा अंदाज होता. पण पावसाने गणित हुकवले. ग्राहकांना दरवाढीची झळ बसू नये यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

गव्हाच्या निर्यातीवर बंधन

या वर्षी गव्हाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध घातले. देशातंर्गत बाजारात गव्हाचा हंगामी पुरवठा कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. भारतीय अन्नधान्य महामंडळाने (FCI) खुल्या बाजारात गव्हाचा मोठा साठा आणला. त्यामुळे किंमती भडकल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

जोरदार उत्पादन

आता अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक राज्यात पावसाने डोळे वटारले. महाराष्ट्रातील अनेक भागात तर गारी पडल्या. त्यामुळे शेतातील उभे पीक आडवे झाले. असे असले तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार नसल्याचे भारतीय अन्नधान्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शोक के मीणा यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाने उत्पादनावर मोठी परिणाम होणार नाही. यंदा गव्हाचे उत्पादन 11.2 कोटी टन असेल, असा दावा त्यांनी केला.

गव्हाची खरेदी सुरु

एफसीआईने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाचे पीक आले आहे. केंद्र सरकारने त्याची खरेदी पण सुरु केली आहे. सोमवारी मध्य प्रदेशमध्ये जवळपास 10,727 टन गव्हाची खरेदी किमान आधारभूत किंमतीवर (MSP) करण्यात आली. भारत जगातील दुसरा सर्वाधिक गव्हाचे उत्पादन करणारा देश आहे. मे 2022 पासून देशात गव्हाच्या किंमती नियंत्रीत करण्यावर जोर देण्यात येत आहे.

इतक्या कोटी टन गव्हाचे उत्पादनाचा अंदाज

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदा गव्हाचे रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्र सरकारने वर्ष 2023-24 (जुलै-जून) मध्ये विक्रमी 11 कोटी 21.8 लाख टन गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात चढउतार होत असतो. पण तरीही यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल, असा दावा त्यांनी केला. अवकाळी पावसामुळे अन्नधान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. थंडीचा चांगला प्रभाव पडतो.

खुल्या बाजारातील विक्रीवर निर्बंध

गहू आणि गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढू नये, यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. त्यासाठी खुल्या बाजारात गव्हाच्या विक्री योजनेवर सध्या प्रतिबंध घालण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किंमती आटोक्यात आणण्यासाठी बफर स्टॉकमधील गहू खूल्या बाजारात आणण्यात आला होता. आता गव्हाच्या किंमती स्थिर आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंमती 30 रुपये प्रति किलो होत्या. आता त्या घसरुन 22-23 रुपये प्रति किलो झाल्याचे त्यांनी सांगितले.

मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.