AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GADGET INSURANCE : गॅझेट विमा का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या विमा काढताना काय काळजी घ्यावी?

सध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर (INSURANCE) फायद्याचं ठरतं.

GADGET INSURANCE : गॅझेट विमा का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या विमा काढताना काय काळजी घ्यावी?
Image Credit source: Google
| Updated on: Aug 15, 2022 | 12:44 PM
Share

नुकतीच करिअरची सुरुवात केलेल्या रमेशनं कर्ज (loan) घेऊन आयफोन खरेदी केलाय. आयफोनसाठी (iPhone) त्याला दोन वर्ष महिना 3000 रुपये इतका EMI भरावा लागणार आहे. फोन घेऊन एकच महिना झाला असताना फोन मेट्रोच्या प्रवासात चोरीला गेला. रमेशला फोन चोरीला गेल्याच्या दु:खासोबतच आता दोन वर्ष हप्ता भरण्याची चिंता सतावत आहे. रमेशने फोन खरेदी करतानाच विमा (INSURANCE) घेतला असता तर ही वेळ आली नसती. आतापर्यंत त्याच्या हातात नवीन फोन आला असता. सध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर फायद्याचं ठरतं. इतर वस्तूंवरील विम्याप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप सारख्या वस्तूंवर देखील विमा संरक्षण मिळते. तुमचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विमा कंपन्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतात.

विमा संरक्षण का महत्त्वाचे?

जेव्हा महागडा मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी कराल तेव्हा विमा संरक्षण घेण्याचा नक्की विचार करा. सहसा या वस्तू खरेदी केल्यानंतर पाच दिवसांच्या आतच विमा पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. विमा संरक्षण एका वर्षासाठी असते. पण काही विमा कंपन्या दोन किंवा तीन वर्षासाठी विमा संरक्षण देतात. स्मार्टफोनचा विमा असताना फोन चोरी झाल्यास विमा कंपनी भरपाई करून देते. तसेच परदेशात असताना देखील तुमच्या वस्तूचे नुकसान झाल्यासही भरपाई मिळते. एवढच नव्हे तर एखाद्या अपघातात फोन डॅमेज झाल्यास, पाण्यात खराब झाल्यास किंवा इन्स्टॉलेशनच्या वेळेस बिघडल्यानंतरही विमा कंपन्या नुकसानीची भरपाई देतात.

विमा कसा काढावा?

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आणि अन्य काही बाबींवर प्रत्येक वस्तूवर एका वर्षांची वॉरंटी देतात. मात्र जर एखादे प्रोडक्ट चोरी किंवा खराब झाल्यास त्याचा खर्च स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे एखादी महागडी वस्तू खरेदी करत असाल तर इन्शुरन्स कव्हर घेणे गरजेचे आहे. यामुळे वस्तूची चोरी किंवा नुकसान झाले तरीही त्याला कव्हर मिळते.विमा केवळ नवीन गॅझेटसाठीच घेतला जाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा. गॅझेट खरेदी करतेवेळी शोरूममध्येच विमा खरेदी करता येतो. सहसा हा विमा कंपन्यांच्या एजंटद्वारे किंवा ब्रँचद्वारे विकला जात नाही. पण एको, ICICI, लोमबार्ड, बजाज फीनसर्व्ह सारख्या कंपन्या फोन सोबत इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी ऑनलाइन इन्शुरन्सचा पर्याय देतात. सरकारी कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स देखील अशा प्रकरचा विमा देत आहे.

किती खर्च येतो

गॅझेटचा विमा हा त्याच्या किंमतीवर अवलंबून असतो. 10,000 रुपयाच्या स्मार्टफोनसाठी 600 रुपयांचा प्रीमियम असतो. 10,000 ते 75,000 रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी 3000 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. महागड्या लॅपटॉपसाठी ही रक्कम 10 ते 12 हजारापर्यंत जाते. स्मार्ट टीव्ही,स्मार्ट अप्लायन्समध्ये सुद्धा विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तूंचा विमा प्रीमियम विविध घटकांवर अवलंबून असतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.