पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, ना परीक्षा ना…

| Updated on: Jul 06, 2024 | 11:41 AM

India Post Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेबद्दलची नोटीस नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, ना परीक्षा ना...
India Post
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे, खरोखरच ही एकप्रकारी मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून राबवली जातंय. अनेकांचे स्वप्न असते भारतीय डाक विभागात नोकरी करण्याचे आणि ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सर्व सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आलीये. बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल. यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. अर्ज करण्यासाठी लिंक अजून सुरू झाली नाहीये, 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.

सध्या या रिक्त पदांसाठीच शॉर्ट नोटीस जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे आवश्यक आहे. हेच नाहीतर उमेदवाराला सायकलही चालवता आली पाहिजे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.

18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. थेट 35 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल. 100 रुपये फीस भरतीसाठी उमदेवारांना भरावी लागणार आहे.