Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?

एकीकडे अवकाळी आणि एकीकडे उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. पावसामुळे परिसरातील वीज खंडित करण्यात आली होती. पण उकडाही भयंकर जाणवत होता. यामुळे दाम्पत्य छतावर झोपले होते.

वीज गेली म्हणून छतावर झोपले होते दाम्पत्य, सकाळी दोघांचे मृतदेहच आढळले, कारण काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 5:28 PM

सार : सध्या गरमीचे दिवस आहेत. माणसं उकाड्याने हैराण आहेत. मात्र या उकाड्याच्या दिवसात ग्रामीण भागात वीज कपात सुरु आहे. अशीच एक घटना हरयाणात उघडकीस आली आहे. घरातील वीज गेली होती. उकाड्याने हैराण झाल्यामुळे पती-पत्नी घराच्या छतावर झोपले होते. मात्र उकाड्यापासून वाचण्यासाठी गेले आणि निसर्गाने प्राणच हिरावून नेले. दाम्पत्य रात्री छतावर झोपले असताना वादळ आले आणि वादळामुळे निर्माणाधीन भिंत कोसळली. यात दाम्पत्य जखमी झाले. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले. कुटुंबीयांनी दाम्पत्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वीज गेल्याने छतावर झोपले होते दाम्पत्य

सध्या देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. पावसामुळे संध्याकाळपासून परिसरातील वीज गेली होती. यामुळे नांगल चौधरी परिसरातील वॉर्ड नंबर 13 रहिवासी विजय आणि त्यांची पत्नी प्रेम देवी हे छतावर झोपले होते. मात्र रात्रीच्या सुमारास पुन्हा वादळ आले. यावेळी विजय यांच्या शेजारच्या घराची निर्माणाधीन भिंत पती-पत्नीच्या अंगावर कोसळली.

दाम्पत्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले

भिंत कोसळल्याचा आवाज आणि दाम्पत्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरचे छतावर धावत गेले. छतावर पाहतात तर पती-पत्नी भिंतीखाली कोसळलेल्या भिंतीखाली दबले होते. घरच्यांनी तात्काळ दोघांना सरकारी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत जोडप्याला दोन मुलं आहेत. मयत विजय ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मुलं खाली घरामध्ये झोपल्यामुळे बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

हे सुद्धा वाचा

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.