AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Couple Death : शिर्डीला दर्शनासाठी चालले होते कुटुंब, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं; काय घडलं नेमकं?

वैशाली यांना त्यांच्या कंपनीकडून शिर्डी साईबाब दर्शनाचे फ्री पास मिळाले होते. पत्नीच्या आग्रहाखातर नरेश हा पत्नी आणि दोन मुलींसोबत शिर्डीला जायला निघाले.

Ambernath Couple Death :  शिर्डीला दर्शनासाठी चालले होते कुटुंब, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं; काय घडलं नेमकं?
शिर्डीला चाललेल्या कुटुंबीयांवर काळाचा घालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 6:16 PM

अंबरनाथ : देवदर्शनाला चाललेल्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला अन् एका क्षणात दोन मुली आई-वडिलांच्या मायेला पारख्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अंबरनाथमधील मोरीवली गावातील उबाळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. नरेश उबाळे आणि वैशाली उबाळे अशी अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. उबाळे कुटुंबीय बसने शिर्डीला दर्शनासाठी चालले होते. मात्र शिर्डीला पोहचण्याआधीच वाटेत त्यांचा घात झाला. त्यांच्या बसला सिन्नर महामार्गावर अपघात झाला आणि अपघातात दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.

नरेश उबाळे हे एका अंबरनाथच्या जनता वाईन शॉपमध्ये काम करत होते. यामुळे उबाळे यांना सुट्टी मिळणे अवघड असायचे. वैशाली उबाळे या घरच्या घरी बॉक्स पॅकिंगची काम करत होती. या दोघांना दोन मुली आहेत.

पत्नीला कंपनीतून शिर्डीचे फ्री पास मिळाले होते

वैशाली यांना त्यांच्या कंपनीकडून शिर्डी साईबाबा दर्शनाचे फ्री पास मिळाले होते. पत्नीच्या आग्रहाखातर नरेश हा पत्नी आणि दोन मुलींसोबत शिर्डीला जायला निघाले. त्यानुसार उबाळे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुली असे हे चौकौनी कुटुंब गुरुवारी रात्री अंबरनाथमधून कंपनीच्या मालकाने व्यवस्था केलेल्या बसने शिर्डीला चालले होते.

हे सुद्धा वाचा

शिर्डीला पोहचण्याआधीच काळाने झडप घातली

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिर्डीला पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि या चौकोनी कुटुंबाचे दोन महत्त्वाचे कोपरे निखळून पडले. कारण घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ त्यांच्या बसचा एका डंपर सोबत भीषण अपघात झाला.

अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

या अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय त्यांची एक मुलगीही जखमी झाली, तर दुसऱ्या मुलीला मात्र सुदैवाने काहीही इजा झाली नाही.

या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नरेश आणि वैशाली यांची यांच्या दोन मुली मात्र आई-वडिलांच्या मायेला कायमच्या पारख्या झाल्या आहेत.

काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.