Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेपासून 1 किमी अंतरावर असताना विद्यार्थ्यासोबत जे घडलं, त्याने काळजात धस्स!

आनंद सायकवरुन शाळेत जात होता, एक किमी अंतरच बाकी होतं, इतक्यात वाटेत...

शाळेपासून 1 किमी अंतरावर असताना विद्यार्थ्यासोबत जे घडलं, त्याने काळजात धस्स!
काळाचा घालाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 11:07 AM

दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Accident) भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडत असताना एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना नुकतीच समोर आली. या थरारक अपघाताचं सीसीटीव्हीदेखील (CCTV Video) काळजी पिळवटून टाकणारं होतं. त्यानंतर आता औरंगाबादमधूनही अपघाताची (Aurangabad Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याला कारने चिरडलं. यात शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जातेय.

वैजापूर गंगापूर रस्त्यावरील बाजाठाण फाटा परिसरात अपघात घडल्याची घटना समोर आलीय. या अपघातामध्ये आनंद अशोक जगताप या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगताप कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

नेमका कशामुळे अपघात?

आनंद जगताप हा विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाला होता. तो नेहमीप्रमाणे आपल्या सायकलवरुन शाळेत जात होता. शाळा अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर होती. त्यावेळी एक भरधाव कार काळ बनून आली आणि तिने आनंदचा जीव घेतला.

हे सुद्धा वाचा

खासदी प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने सायकलवरुन जात असलेल्या आनंद जगताप या विद्यार्थ्याला मागून जोरदार धडक दिली. ही धकड इतकी भीषण होती की शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शाळेत कळल्यानंतर शाळेतील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तर मृत विद्यार्थ्या पालकांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता.

राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. भरधाव वेगाने गाड्या हाकणं, लेन मोडणं, अतिवेग, ओव्हरटेकिंग या कारणांमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्याचं जाणकार सांगतात. आता शाळेत जाणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर काळानं घातल्यामुळे दुःख व्यक्त केलं जातंय.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.