Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Morivali Village : रात्रीपर्यंत देवदर्शनाचा उत्साह, पहाटे गावभर स्मशानशांतता

बसचा पहाटेच्या सुमारास घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. दिवस उजाडताच ही बातमी मोरीवली गावात येऊन धडकली आणि गावात स्मशानशांतता पसरली.

Ambernath Morivali Village :  रात्रीपर्यंत देवदर्शनाचा उत्साह, पहाटे गावभर स्मशानशांतता
बस अपघातानंतर अंबरनाथमधील मोरीवली गावावर शोककळाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:49 PM

अंबरनाथ : अंबरनाथमधील कालपर्यंत उत्साहात असणारा मोरीवली गाव आज दुःखात बुडाला आहे. काल रात्री याच गावात शिर्डीला साईदर्शनाला जाण्यासाठी गावकऱ्यांची लगबग सुरु होती. आज तेथे स्मशानशांतता पसरलेली दिसतेय. याचे कारण म्हणजे शिर्डीसाठी निघालेल्या बसला घोटी सिन्नर मार्गावर अपघात झाला. या अपघातात गावातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला. काल शिर्डीसाठी निघालेल्या या लोकांचे आज थेट मृतदेहच गावात परतले होते. बस अपघातात एकूण 10 जण मृत्यूमुखी पडले तर 35 जण जखमी झाले. मृत 10 जणांपैकी 8 जण केवळ मोरीवली गावातील रहिवासी होते. तर जखमींपैकी 16 जखमी हे एकट्या मोरीवली गावातले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

दरवर्षीप्रमाणे शिर्डी यात्रा आयोजित केली होती

अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीच्या मालकाकडून दरवर्षी शिर्डी यात्रा आयोजित केली जाते. यासाठी या कंपनीत पॅकिंगचं काम करणाऱ्या महिलांना यावर्षी पासेस वाटण्यात आले होते.

हेच पास घेऊन मोरीवली गावातील जवळपास 35 ते 40 भाविक गुरुवारी रात्री शिर्डीला जाण्यासाठी निघाले. मोरीवली गावातून रात्री साडेनऊच्या सुमारास 15 लक्झरी बसेस रवाना झाल्या. यापैकी 14 बस सकाळी शिर्डीत पोहोचल्या, मात्र एक बस पोहोचलीच नाही.

हे सुद्धा वाचा

घाटी सिन्नर महामार्गावर बसला अपघात

या बसचा पहाटेच्या सुमारास घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील तब्बल 10 जण मृत्युमुखी पडले, तर ३५ जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अंबरनाथच्या मोरीवली गावातील 8 जणांचा समावेश होता.

दिवस उजाडताच गावात बातमी आली अन्…

दिवस उजाडताच ही बातमी मोरीवली गावात येऊन धडकली आणि गावात स्मशानशांतता पसरली. मोरीवली गावातील नरेश उबाळे, वैशाली उबाळे, श्रावणी बारस्कर, श्रद्धा बारस्कर, प्रमिला गोंधळी, दीक्षा गोंधळी, रोशनी वाडेकर आणि बालाजी मोहंती या 8 जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 35 जण जखमी झाले.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

या अपघाताची माहिती मिळताच एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

तर दुसरीकडे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, भाजप शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मोरीवली गावात धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचं सांत्वन केलं. या एका घटनेमुळे मोरीवली गावातील अनेक घरांचं घरपणच गेलंय.

आजवर इतका मोठा अपघात आणि इतकी दुर्दैवी घटना गावाच्या इतिहासात कधीही घडलेली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र या अपघातानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेल्याचं पाहायला मिळतंय.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.