Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haryana Murder Mystery | 20 वर्षीय बेपत्ता तरुणाचं गूढ सहा महिन्यांनी उकललं, शेतात मृतदेह सापडला

अजय हा वजिराबाद परिसरात लॉन्ड्रीचे काम करायचा. मेडिकल स्टोअर चालकांना अजयने मोबाईल चोरल्याचा संशय होता, हे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले.

Haryana Murder Mystery | 20 वर्षीय बेपत्ता तरुणाचं गूढ सहा महिन्यांनी उकललं, शेतात मृतदेह सापडला
तरुणाच्या हत्येचे गूढ सहा महिन्यांनी उकललेImage Credit source: सोशल
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:01 PM

गुरुग्राम : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा (Murder) आता पोलिसांनी खुलासा केला आहे. मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) संशयावरून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत सहभागी असलेल्या 4 आरोपींना अटक करून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. खुनाच्या आरोपींनी सहा महिन्यांपूर्वी अजय नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह रेवाडीतील शेतात पुरला होता. हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram Haryana) घडलेल्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुग्राम क्राईम ब्रँचने आरोपींच्या सांगण्यावरून अजयचा मृतदेह कियारेवाडीच्या शेतातून बाहेर काढला. अजय हा वजिराबाद परिसरात लॉन्ड्रीचे काम करायचा. मेडिकल स्टोअर चालकांना अजयने मोबाईल चोरल्याचा संशय होता, हे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले. या संशयातूनच त्यांनी अजयला इतकी मारहाण केला की त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या निशांत, अरुण, रुबम, अमित आणि अन्य एकाला गुन्हे शाखेने वजिराबाद येथून अटक केली आहे.

काठीने बेदम मारहाण करुन हत्या

पोलिसांच्या क्राईम युनिट सेक्टर 40 मध्ये 20 वर्षीय तरुणाच्या हत्येची अशी घटना उघडकीस आली आहे, जिचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांना सहा महिने लागले. ही घटना 12 ऑक्टोबर 2021 रोजी वजिराबाद भागात घडली होती. बालाजी मेडिकल स्टोअरच्या संचालकांनी मोबाईल चोरीच्या संशयावरून 20 वर्षीय अजयची काठीने बेदम मारहाण करुन हत्या केली. रेवाडी परिसरातील शेतात मृतदेह पुरुन ते पोलिसांची दिशाभूल करत होते. त्यानंतर क्राईम युनिट सेक्टर 40 ला हत्या प्रकरणाचा सुगावा लागला आणि पोलिसांनी खुनाचा खळबळजनक खुलासा केला.

हे सुद्धा वाचा

20 वर्षीय अजय अचानक बेपत्ता झाल्याने गुन्हे शाखेत खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अरुण, रुबल आणि अमित यांची गुन्हे शाखेने वारंवार चौकशी केली, मात्र प्रत्येक वेळी आरोपी पोलिसांची चलाखीने दिशाभूल करण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा या घटनेतील चौथा आरोपी निशांत याची क्राईम ब्रँचने कसून चौकशी सुरू केली, तेव्हा निशांतने पुन्हा पुन्हा आपले म्हणणे बदलण्यास सुरुवात केली. पोलिसांचा संशय बळावू लागला. मग काय, तपास वाढला आणि 20 वर्षीय अजयच्या हत्येचे गूढ उकलले.

…आणि बिंग फुटलं

निशांतच्या कबुलीनंतर इतर तिघांचीही चौकशी करण्यात आली, त्यानंतर चारही मारेकऱ्यांनी खुनाची कबुली तर दिलीच, पण हत्येनंतर 24 तास मृतदेह घरात कसा ठेवला, याचंही गूढ दुसऱ्या रात्री उघडकीस आलं. या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने निशांत, अमित, अरुण आणि रुबम यांना अटक केली आहे. अजयचा मृतदेह आरामपूर येथील शेतातून जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.