Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात तीन निष्पाप प्रवाशांचा हकनाक बळी गेला. यापैकी दोघांची ओळख पटवण्यास यश आले आहे.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !
गोळीबारातील दोन मृत प्रवाशांची ओळख पटलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 3:57 PM

गोविंद ठाकूर, विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या तीन प्रवाशांपैकी दोघांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. कादर भानपुरावाला आणि असगर अशी दोघांची नावे आहेत. कादर हे नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर असगर हे मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी कळताच दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.

कादर पुनावाला नालासोपारा येथील रहिवासी

कादर पुनावाला हे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील तेज प्रतिमा इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. कादर हे मोहरमनिमित्त जयपूरला नातेवाईकाकडे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला परतत असतानाच ही घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळात ते आपल्या इच्छित स्थानकाजवळ पोहचणार इतक्यातही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कादर यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयाकडे धाव घेतली.

असगर कामाच्या शोधात मुंबईकडे निघाला अन्…

दुसरा मयत असगर हा मूळचा बिहारमधील मधुबनी येथील असून, कामाच्या शोधात तो जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुलं आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त ते मुंबईत येत होते. आरोपीने असगरवर चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी असगरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. असगरच्या कुटुंबीयांनी आरोपीला कोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच असगरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.