Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 

नाशिक जिल्ह्यातल्या चाचडगावजवळ आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रकच्या टक्करने पिकअप व्हॅनचा चुराडा; नाशिकचे 3 तरुण गतप्राण, दोघे गंभीर 
नाशिकमध्ये चाचडगावजवळ ट्रकच्या धडकेत पिकअप व्हॅनचा चुराडा झाला.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:44 AM

नाशिकः नाशिक-पेठ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये (Accident) तीन तरुण (Youth) जागीच ठार झालेत. आयशर आणि पिकअप व्हॅनमध्ये हा अपघात झाला. यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. कमलेश मोरे, संतोष लांडे, हेमंत मोरे अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण चाचडगावचे आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरलीय. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पेठ येथून एक आयशर (एमएच 15, पीव्ही 8934) नाशिककडे (Nashik) जात होता. तर चाचडगावहून एक पिकअप व्हॅन (एमएच 15, एजी 937) पेठकडे जात होती. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली. या अपघातात पिकअपमधील संतोष हिरामण लांडे (वय 25), कमलेश सुखदेव मोरे (वय 27) आणि हेमंत रघुनाथ मोरे (वय 26) या चाचडगाव येथील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये लखन भगवान गांगोडे आणि रवींद्र वामन पोटींदे हे दोघे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रस्त्यावर रक्ताचा सडा

आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती समजली. ते ही तातडीने पोहचले. त्यांनी रस्त्यावरील मृतदेह, अपघातग्रस्त वाहने हटवली. या घटनेने चाचडगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचेही अपघात सत्र थांबताना दिसत नाही. हे मृत्यू थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली. कठोर हेल्मेटसक्ती केली. मात्र, त्यानंतरही कोणी हेल्मेट घालत नाही. अपघात सुरूच आहे. त्यात अनेकांचे मृत्यू होत आहेत.

वेगावर नियंत्रण ठेवा

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. हे पाहता वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वेगाची नशा जीवनावर भारी पडते. हे ध्यानात घेऊनच वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, वाहनधारक इकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अपघातातील मृतांचे प्रमाण वाढले आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी.