Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत भागात तीन दिवसांपूर्वी दीपिका ताकाटे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडला होता (Nashik College Girl Murder)

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं
नाशिकमधील तरुणीची चुलतभावाकडून हत्या
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:34 PM

नाशिक : नाशिकमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. चुलतभावानेच तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत भागात तीन दिवसांपूर्वी दीपिका ताकाटे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह सापडला होता. पिंपळगाव नजीक आहेर गावच्या पाण्याच्या पाटात दीपिका ताकाटे मृतावस्थेत आढळली होती. दीपिकाची हत्या झाली, तिचा अपघात झाला की तिने आत्महत्या केली, हा संशय होता.

तरुणी संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने संशय

दीपिकाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा असल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर दीपिकाची हत्याच झाल्याचं आता उघडकीस आलं आहे. दीपिका ताकाटे कॉलेजला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. मुलगी संध्याकाळ होऊनही घरी का आली नाही, याचा शोध कुटुंबीयांनी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचा मृतदेह पालखेडमधील डाव्या कालव्यात आढळून आला.

साथीदाराच्या मदतीने चुलतभावाकडून हत्या

चुलत भाऊ विक्रम ताकाटे यानेच दीपिकाची गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आपल्या साथीदाराची मदत घेऊन आरोपीने दीपिकाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. दीपिकाच्या हत्यचे नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

दुसरीकडे, मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या तरुणाची इर्षेतून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नवी मुंबईत घडलेल्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घणसोली भागातील झाडीत टाकला होता. (Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा

नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.

पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

संबंधित बातम्या :

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवल्याचा राग, नाशिकच्या मित्राकडून नवी मुंबईत तरुणाची हत्या

‘जीवनसाथी’वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा

(Nashik College Girl Murder case solved Cousin killed)

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.